शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

इंदिराजी, राजीव गांधींच्या बदनामीचे तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:50 IST

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात अवमानकारक मजकूर असल्याच्या मुद्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी एकच गदारोळ केला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात अवमानकारक मजकूर असल्याच्या मुद्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी एकच गदारोळ केला. हा मजकूर तातडीने काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली; पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नंतर केलेल्या निवेदनात तसे कोणतेही आश्वासन दिले नाही.प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा मुद्दा उचलला. त्यांनी तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी या विषयावर जनतेत संतप्त प्रतिक्रिया असल्याचे नमूद केले.थोर नेत्यांची बदनामी करण्याचा सरकारचा अजेंडा आहे का? असा सवाल विखे यांनी केला. त्यावर, अशी मानहानी करण्याची सरकारची भूमिका नसल्याचे स्पष्ट करीत याविषयी शिक्षणमंत्री सभागृहात निवेदन करतील. आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याविषयी पाठ्यपुस्तक मंडळाला कळविले जाईल, असे सांसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. त्याने समाधान न झालेले विरोधी पक्षांचे सदस्य गोंधळ घालू लागले. गदारोळात अध्यक्षांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप केले आणि त्यावरून गोंधळाला सुरुवात झाली.विनोद तावडे यांनी यासंबंधी निवेदन करताना सांगितले की, इयत्ता नववीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळाबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या सन २००० पर्यंतच्या ठळक घटनांचाही समावेश करण्यात आला आहे. या काळात विविध प्रधानमंत्र्यांच्या कार्यकाळातील निर्णय आणि घटनांचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या काळातील घटनांच्या उल्लेखाच्या अनुषंगाने बोफोर्स प्रकरणामुळे सरकार गेल्याचे म्हटले आहे. हा इतिहास सन २००० सालापर्यंतचाच असल्याने आणि राजीव गांधी यांच्या निर्दोषत्वावर त्यानंतर निर्णय झाल्याने त्याबाबत अभ्यासक्रमात उल्लेख आलेला नाही.यास्तव अशा घटनांमुळे कोणाचीही बदनामी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील, असे तावडे म्हणाले.