शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

इंदिराजी, राजीव गांधींच्या बदनामीचे तीव्र पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:50 IST

दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात अवमानकारक मजकूर असल्याच्या मुद्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी एकच गदारोळ केला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात अवमानकारक मजकूर असल्याच्या मुद्यावरून आज विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी एकच गदारोळ केला. हा मजकूर तातडीने काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली; पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नंतर केलेल्या निवेदनात तसे कोणतेही आश्वासन दिले नाही.प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हा मुद्दा उचलला. त्यांनी तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी या विषयावर जनतेत संतप्त प्रतिक्रिया असल्याचे नमूद केले.थोर नेत्यांची बदनामी करण्याचा सरकारचा अजेंडा आहे का? असा सवाल विखे यांनी केला. त्यावर, अशी मानहानी करण्याची सरकारची भूमिका नसल्याचे स्पष्ट करीत याविषयी शिक्षणमंत्री सभागृहात निवेदन करतील. आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याविषयी पाठ्यपुस्तक मंडळाला कळविले जाईल, असे सांसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. त्याने समाधान न झालेले विरोधी पक्षांचे सदस्य गोंधळ घालू लागले. गदारोळात अध्यक्षांनी कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप केले आणि त्यावरून गोंधळाला सुरुवात झाली.विनोद तावडे यांनी यासंबंधी निवेदन करताना सांगितले की, इयत्ता नववीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यपूर्व काळाबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या सन २००० पर्यंतच्या ठळक घटनांचाही समावेश करण्यात आला आहे. या काळात विविध प्रधानमंत्र्यांच्या कार्यकाळातील निर्णय आणि घटनांचाही समावेश आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या काळातील घटनांच्या उल्लेखाच्या अनुषंगाने बोफोर्स प्रकरणामुळे सरकार गेल्याचे म्हटले आहे. हा इतिहास सन २००० सालापर्यंतचाच असल्याने आणि राजीव गांधी यांच्या निर्दोषत्वावर त्यानंतर निर्णय झाल्याने त्याबाबत अभ्यासक्रमात उल्लेख आलेला नाही.यास्तव अशा घटनांमुळे कोणाचीही बदनामी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील, असे तावडे म्हणाले.