शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

एकाच्या बदल्यात दहा हेच भारताचे धोरण- हंसराज अहिर

By admin | Updated: May 9, 2017 20:37 IST

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याच्या प्रकारावर देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जोरदार टीका केली आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 9 - पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याच्या प्रकारावर देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जोरदार टीका केली आहे. भारतासमोर उभे राहण्याची पाकिस्तानची क्षमता नाही. पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर देण्यात येईल व एकाच्या बदल्यात दहा हेच भारताचे धोरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.नागपूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रत्यक्षात पाकिस्तान हा कमकुवत देश आहे. भारताच्या कुरापती काढण्याची पाकिस्तानची अगोदरपासूनची सवय आहे. मात्र त्यांचे भ्याड हल्ले आता सहन केले जाणार नाहीत. त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल. यापुढे आपण हल्ले सहन करायचे नाहीत व मार खायचा नाही, हे सैन्यदलाला सांगण्यात आले आहे, असे अहिर यांनी सांगितले. इराकने पाकिस्तानवर कारवाई करण्याची भाषा वापरली आहे. इराकच्या धोरणावर आपण समाधानी असून पाकिस्तान दहशतवादी कृत्यांना खतपाणी घालत असल्याचे जगासमोर येत आहे. पाकला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेल, असेदेखील ते म्हणाले.नक्षलवादावर विकास हेच उत्तरछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाया वाढत आहेत. याबाबत हंसराज अहिर यांना विचारणा केली असता नक्षलवाद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फार काळ नक्षलवाद्यांच्या कारवाया चालणार नाहीत. पुढे असले हल्ले होऊ नयेत याबाबत सुरक्षादलांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल व त्यांना शस्त्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, याचीदेखील काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद मूळापासून नष्ट करायचा असेल तर आदिवासी भागात विकास होणे आवश्यक आहे. विकास हेच नक्षलवादावर उत्तर आहे, असे ते म्हणाले.