शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

जागतिक शांततेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची

By admin | Updated: November 28, 2015 02:05 IST

आधुनिक युगात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. संपूर्ण जगाला आज दहशतवादाचा धोका आहे. या परिस्थितीत जागतिक शांतता टिकविण्याच्या प्रक्रियेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे

पुणे : आधुनिक युगात युद्धाचे स्वरूप बदलले आहे. संपूर्ण जगाला आज दहशतवादाचा धोका आहे. या परिस्थितीत जागतिक शांतता टिकविण्याच्या प्रक्रियेत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) १२९व्या तुकडीच्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी एनडीएचे कमांडंट जी. अशोक कुमार, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला, डेप्युटी कमांडंट एस.के. राव उपस्थित होते. या वेळी बी.ए., बी.एस्सी., बी. एस्सी. कॉम्प्युटर या शाखांच्या ३३३ विद्यार्थ्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी बहाल करण्यात आली.बीए शाखेतील अभिषेक कुंडलिया या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच त्याला चीफ आॅफ एअर स्टाफच्या रौप्यपदकाने, विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या राकेश काद्यान याला चीफ आॅफ आर्मी स्टाफच्या रौप्यपदकाने, तर जितेंद्र कुमार याला चीफ आॅफ नेव्हल स्टाफच्या रौप्यपदकाने गौरविण्यात आले. जितेंद्र कुमारने तिन्ही विभागांतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून नौदलचषक पटकावला. आजोबा आणि वडील सैन्यात असल्याने लष्करात दाखल होण्याची प्रेरणा मिळाली. एनडीएच्या तिन्ही शाखांतून प्रथम येणे ही गौरवाची बाब आहे. एनडीएतील दिनक्रम कसोटी पाहणारा होता. मिलिटरी इंटेलिजन्समध्ये काम करण्याची इच्छा आहे. - जितेंद्र कुमार, बेस्ट स्टुडंट