शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

भारतीय तरुणाची १४ महिन्यांच्या ‘वनवासा’नंतर सुटका

By admin | Updated: September 29, 2016 06:23 IST

सोशल मीडियाच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्या तरी त्याचा विधायक वापरही होऊ शकतो, याचा प्रत्यय कर्नाटकातील अकबर बादशहा या तरुणाबाबत घडलेल्या घटनेतून आला आहे

- जमीर काझी, मुंबई

सोशल मीडियाच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्या तरी त्याचा विधायक वापरही होऊ शकतो, याचा प्रत्यय कर्नाटकातील अकबर बादशहा या तरुणाबाबत घडलेल्या घटनेतून आला आहे. नोकरीच्या निमित्ताने सौदी अरेबियात गेल्या १४ महिन्यांपासून मालकाकडून फसवणूक झालेल्या या तरुणाला लवकरच भारतीय दूतावासाकडून स्वदेशात पाठविले जाणार आहे. आपल्यावरील अन्यायाचे मोबाइलवर शूटिंग करून सोशल मीडियावरून व्हायरल केलेल्या व्हिडीओने त्याचा भारतातील परतीचा मार्ग निश्चित केला आहे. आपली फसवणूक आणि भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची कैफियत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी व्हिडीओ क्लिप शेअर करण्याचे आवाहन त्याने केले होते. त्याची ही क्लिप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व सौदीतील भारतीय राजदूत अहमद जावेद यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यात आला. प्रस्तुत प्रतिनिधीने ती क्लिप जावेद यांना ‘व्हाट्सअ‍ॅप’वर पाठविली होती. त्याची दखल घेत त्यांनी पुढील कार्यवाही केली. कर्नाटकातील सागर शहरातील अकबर बादशहा गेल्या वर्षी जुलैमध्ये सौदीतील नजरान शहरात घरकामासाठी गेला होता. - पगाराबाबत मालक टोलवाटोलवी करीत असे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अकबरने भारतात परत जाण्यासाठी पासपोर्टची मागणी केली. त्यावर त्याला ५ हजार रियाल दिले तरच परत जाता येईल, असे सांगून धमकावले. त्याला घरात डांबून त्याची उपासमार करू लागला. - अखेर अकबरने एका मित्राच्या साहाय्याने आपल्यावरील अन्यायाची मोबाइलवर व्हिडीओ क्लिप बनवून गावाकडील एका मित्राला मोबाइलवर पाठविली. ती क्लिप सौदीतील राजदूत अहमद जावेद यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेत अधिकाऱ्यांना अकबरचा शोध घेण्याची सूचना केली. त्यानंतर नजरान येथे त्याची भेट घेत अधिकाऱ्यांनी संबंधिताकडून त्याचे पासपोर्ट व अन्य पेपर घेतले. - गेल्या आठवड्यात अकबरने कशीबशी सुटका करून घेत जेद्दाह येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांची भेट घेत आपला पासपोर्ट मिळवून देण्याची विनंती केली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी रकमेची मागणी केली. अकबरने नकार देत पैसे नसल्याने दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी ‘या कामात तुझी काहीही मदत करू शकत नाही, तू परत मालकाकडे जा, मुदत संपल्यानंतर भारतात पाठविले जाईल, तुझे काम करण्यास आम्ही बांधील नाही’, असे दरडावत हुसकावून लावले. अकबरचा शोध घेऊन तो काम करीत असलेल्या संबंधिताकडून त्याचे पासपोर्ट व अन्य महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत. कराराप्रमाणे त्याचे थकीत वेतन मिळवून देण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने उद्या गुरूवारी त्याला सौदीतून बंगळूरू येथे पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित मालकावर कार्यवाही केली जाणार आहे. - अहमद जावेद (सौदी अरेबियातील भारतीय राजदूत)