शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तरुणाची १४ महिन्यांच्या ‘वनवासा’नंतर सुटका

By admin | Updated: September 29, 2016 06:23 IST

सोशल मीडियाच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्या तरी त्याचा विधायक वापरही होऊ शकतो, याचा प्रत्यय कर्नाटकातील अकबर बादशहा या तरुणाबाबत घडलेल्या घटनेतून आला आहे

- जमीर काझी, मुंबई

सोशल मीडियाच्या गैरवापराच्या घटना वाढत असल्या तरी त्याचा विधायक वापरही होऊ शकतो, याचा प्रत्यय कर्नाटकातील अकबर बादशहा या तरुणाबाबत घडलेल्या घटनेतून आला आहे. नोकरीच्या निमित्ताने सौदी अरेबियात गेल्या १४ महिन्यांपासून मालकाकडून फसवणूक झालेल्या या तरुणाला लवकरच भारतीय दूतावासाकडून स्वदेशात पाठविले जाणार आहे. आपल्यावरील अन्यायाचे मोबाइलवर शूटिंग करून सोशल मीडियावरून व्हायरल केलेल्या व्हिडीओने त्याचा भारतातील परतीचा मार्ग निश्चित केला आहे. आपली फसवणूक आणि भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची कैफियत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी व्हिडीओ क्लिप शेअर करण्याचे आवाहन त्याने केले होते. त्याची ही क्लिप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व सौदीतील भारतीय राजदूत अहमद जावेद यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर युद्धपातळीवर त्याचा शोध घेण्यात आला. प्रस्तुत प्रतिनिधीने ती क्लिप जावेद यांना ‘व्हाट्सअ‍ॅप’वर पाठविली होती. त्याची दखल घेत त्यांनी पुढील कार्यवाही केली. कर्नाटकातील सागर शहरातील अकबर बादशहा गेल्या वर्षी जुलैमध्ये सौदीतील नजरान शहरात घरकामासाठी गेला होता. - पगाराबाबत मालक टोलवाटोलवी करीत असे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अकबरने भारतात परत जाण्यासाठी पासपोर्टची मागणी केली. त्यावर त्याला ५ हजार रियाल दिले तरच परत जाता येईल, असे सांगून धमकावले. त्याला घरात डांबून त्याची उपासमार करू लागला. - अखेर अकबरने एका मित्राच्या साहाय्याने आपल्यावरील अन्यायाची मोबाइलवर व्हिडीओ क्लिप बनवून गावाकडील एका मित्राला मोबाइलवर पाठविली. ती क्लिप सौदीतील राजदूत अहमद जावेद यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेत अधिकाऱ्यांना अकबरचा शोध घेण्याची सूचना केली. त्यानंतर नजरान येथे त्याची भेट घेत अधिकाऱ्यांनी संबंधिताकडून त्याचे पासपोर्ट व अन्य पेपर घेतले. - गेल्या आठवड्यात अकबरने कशीबशी सुटका करून घेत जेद्दाह येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांची भेट घेत आपला पासपोर्ट मिळवून देण्याची विनंती केली. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी रकमेची मागणी केली. अकबरने नकार देत पैसे नसल्याने दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी ‘या कामात तुझी काहीही मदत करू शकत नाही, तू परत मालकाकडे जा, मुदत संपल्यानंतर भारतात पाठविले जाईल, तुझे काम करण्यास आम्ही बांधील नाही’, असे दरडावत हुसकावून लावले. अकबरचा शोध घेऊन तो काम करीत असलेल्या संबंधिताकडून त्याचे पासपोर्ट व अन्य महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेण्यात आले आहेत. कराराप्रमाणे त्याचे थकीत वेतन मिळवून देण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने उद्या गुरूवारी त्याला सौदीतून बंगळूरू येथे पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित मालकावर कार्यवाही केली जाणार आहे. - अहमद जावेद (सौदी अरेबियातील भारतीय राजदूत)