शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

दुष्काळमुक्तीसाठी सरसावली भारतीय जैन संघटना

By admin | Updated: May 16, 2017 02:21 IST

भारतीय जैन संघटनेने आता राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी गावेच्या गावे पिंजून काढायला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय जैन संघटनेने आता राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी गावेच्या गावे पिंजून काढायला सुरुवात केली आहे. संघटनेचे कार्यकर्ते १३ जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांत गावकऱ्यांच्या मदतीने थेट श्रमदानात सहभागी झाले आहेत.अभिनेता अमीर खान यांनी ‘पानी फाउंडेशन’च्या माध्यमातून गतवर्षीपासून गावपातळीवर वॉटरकप स्पर्धा राबविण्यास सुरुवात केली आहे. या स्पर्धेंतर्गत ६६७ गावांतील नागरिक यंदाच्या पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी त्यांच्या शिवारात मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान करीत आहेत. या श्रमदानाला अधिक बळ मिळावे, यासाठी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथ्था, राज्य समितीचे सुदर्शन जैन यांनी २८५ जेसीबी, पोकलँड मशिन देऊन भरीव सहकार्य केले आहे. गावपातळीवर सुरू झालेल्या श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांनी वेग घेतला आहे. गावकऱ्यांनी मागणी केल्यास अधिक यंत्र उपलब्ध करून दिले जातील, असे शांतीलाल मुथ्था यांनी सांगितल्याने, गावकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर करणे केवळ शासनाचे कर्तव्य नसून, सामाजिक दायित्व म्हणून जैन संघटना पुढे सरसावल्याचे शांतीलाल मुथ्था यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्यात एकाच वेळी २८५ जेसीबी, पोकलँडद्वारे जलसंधारणाची कामे होत आहेत. यात गावकऱ्यांचे श्रमदान लाखमोलाचे ठरत आहे. सामूहिक प्रयत्नाने नक्कीच राज्य दुष्काळमुक्त होईल.- सुदर्शन जैन, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जैन संघटना