शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भारत मोठा होण्यासाठी तो भारत राहिला पाहिजे - मोहन भागवत

By admin | Updated: April 14, 2017 22:17 IST

भारत मोठा होण्यासाठी तो मुळात भारत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 14 : भारत मोठा होण्यासाठी तो मुळात भारत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांच्या षट्यब्दीपूर्ती सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते. बोरीवलीच्या जनसेवा केंद्रात हा सोहळा रंगला. भागवत पुढे म्हणाले, व्यक्ती, समाज आणि सृष्टी या तिन्ही सत्ता पुढे गेल्या तर त्यात सर्वांचे सुख आहे. त्यासाठीचे गुण आपल्यात आहेत. कर्तव्य कर्म आपण पार पाडत असतो. त्यामुळे ईश्वराची पूजा केल्याप्रमाणे आपण जगतो. भारत मोठा होईल, असे आपण गौरवाने म्हणतो. तसेच सगळ्या जगालाही आपण मोठे झाले पाहिजे असेच वाटते. मात्र भारत मोठा व्हावा, असे वाटत असेल तर तो मुळात ह्यभारतह्ण राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली संस्कृती जपणे महत्वाचे आहे. त्यासाठी वासुदेव कामत यांच्यासारखी उदाहरणे समाजासमोर यायली हवीत, असे म्हणत कामत यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. कामत यांनी त्यांची कला समाजासाठी खर्ची घालत सत्यम, शिवम आणि सुंदरमचे दर्शन घडविले आहे. कलाकार कलेचा आस्वाद स्वत: घेतो तसेच सामान्य माणसाना देखील तो घेता येतो, असेही ते म्हणाले. यावेळी मानपत्र देऊन कामत यांचा सपत्नीक डॉ भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...कलेतून आनंद आणि समाधानमी कलेवर भरभरून प्रेम केले, त्यामुळे असा सत्कार सोहळा कलाकाराला कधीच अपेक्षित नसतो. कलावंताला खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा त्याची कलाकृती एखाद्या सामान्य घराच्या भिंतीवर आरूढ होते, अशा शब्दांत वासुदेव कामत यांनी सत्काराला उत्तर दिले. सत्कारप्रसंगी प्रोत्साहन देणाऱ्यांची आठवण येते. शिवाय वडीलांचे दोन प्रश्नही आठवतात. सकाळी आज तू कोणते चित्र काढले? आणि संध्याकाळी शाखेत गेला होतास का? त्यातून संस्कारांचे वळण लागले. कला आपल्याला अंतर्मुख करते. त्यातूनच आनंद आणि समधान मिळतेह्ण, असेही कामत म्हणाले.