शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

भारत मोठा होण्यासाठी तो भारत राहिला पाहिजे - मोहन भागवत

By admin | Updated: April 14, 2017 22:17 IST

भारत मोठा होण्यासाठी तो मुळात भारत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 14 : भारत मोठा होण्यासाठी तो मुळात भारत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांच्या षट्यब्दीपूर्ती सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते. बोरीवलीच्या जनसेवा केंद्रात हा सोहळा रंगला. भागवत पुढे म्हणाले, व्यक्ती, समाज आणि सृष्टी या तिन्ही सत्ता पुढे गेल्या तर त्यात सर्वांचे सुख आहे. त्यासाठीचे गुण आपल्यात आहेत. कर्तव्य कर्म आपण पार पाडत असतो. त्यामुळे ईश्वराची पूजा केल्याप्रमाणे आपण जगतो. भारत मोठा होईल, असे आपण गौरवाने म्हणतो. तसेच सगळ्या जगालाही आपण मोठे झाले पाहिजे असेच वाटते. मात्र भारत मोठा व्हावा, असे वाटत असेल तर तो मुळात ह्यभारतह्ण राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली संस्कृती जपणे महत्वाचे आहे. त्यासाठी वासुदेव कामत यांच्यासारखी उदाहरणे समाजासमोर यायली हवीत, असे म्हणत कामत यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. कामत यांनी त्यांची कला समाजासाठी खर्ची घालत सत्यम, शिवम आणि सुंदरमचे दर्शन घडविले आहे. कलाकार कलेचा आस्वाद स्वत: घेतो तसेच सामान्य माणसाना देखील तो घेता येतो, असेही ते म्हणाले. यावेळी मानपत्र देऊन कामत यांचा सपत्नीक डॉ भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...कलेतून आनंद आणि समाधानमी कलेवर भरभरून प्रेम केले, त्यामुळे असा सत्कार सोहळा कलाकाराला कधीच अपेक्षित नसतो. कलावंताला खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा त्याची कलाकृती एखाद्या सामान्य घराच्या भिंतीवर आरूढ होते, अशा शब्दांत वासुदेव कामत यांनी सत्काराला उत्तर दिले. सत्कारप्रसंगी प्रोत्साहन देणाऱ्यांची आठवण येते. शिवाय वडीलांचे दोन प्रश्नही आठवतात. सकाळी आज तू कोणते चित्र काढले? आणि संध्याकाळी शाखेत गेला होतास का? त्यातून संस्कारांचे वळण लागले. कला आपल्याला अंतर्मुख करते. त्यातूनच आनंद आणि समधान मिळतेह्ण, असेही कामत म्हणाले.