शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

भारत मोठा होण्यासाठी तो भारत राहिला पाहिजे - मोहन भागवत

By admin | Updated: April 14, 2017 22:17 IST

भारत मोठा होण्यासाठी तो मुळात भारत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 14 : भारत मोठा होण्यासाठी तो मुळात भारत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांच्या षट्यब्दीपूर्ती सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते. बोरीवलीच्या जनसेवा केंद्रात हा सोहळा रंगला. भागवत पुढे म्हणाले, व्यक्ती, समाज आणि सृष्टी या तिन्ही सत्ता पुढे गेल्या तर त्यात सर्वांचे सुख आहे. त्यासाठीचे गुण आपल्यात आहेत. कर्तव्य कर्म आपण पार पाडत असतो. त्यामुळे ईश्वराची पूजा केल्याप्रमाणे आपण जगतो. भारत मोठा होईल, असे आपण गौरवाने म्हणतो. तसेच सगळ्या जगालाही आपण मोठे झाले पाहिजे असेच वाटते. मात्र भारत मोठा व्हावा, असे वाटत असेल तर तो मुळात ह्यभारतह्ण राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली संस्कृती जपणे महत्वाचे आहे. त्यासाठी वासुदेव कामत यांच्यासारखी उदाहरणे समाजासमोर यायली हवीत, असे म्हणत कामत यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. कामत यांनी त्यांची कला समाजासाठी खर्ची घालत सत्यम, शिवम आणि सुंदरमचे दर्शन घडविले आहे. कलाकार कलेचा आस्वाद स्वत: घेतो तसेच सामान्य माणसाना देखील तो घेता येतो, असेही ते म्हणाले. यावेळी मानपत्र देऊन कामत यांचा सपत्नीक डॉ भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...कलेतून आनंद आणि समाधानमी कलेवर भरभरून प्रेम केले, त्यामुळे असा सत्कार सोहळा कलाकाराला कधीच अपेक्षित नसतो. कलावंताला खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा त्याची कलाकृती एखाद्या सामान्य घराच्या भिंतीवर आरूढ होते, अशा शब्दांत वासुदेव कामत यांनी सत्काराला उत्तर दिले. सत्कारप्रसंगी प्रोत्साहन देणाऱ्यांची आठवण येते. शिवाय वडीलांचे दोन प्रश्नही आठवतात. सकाळी आज तू कोणते चित्र काढले? आणि संध्याकाळी शाखेत गेला होतास का? त्यातून संस्कारांचे वळण लागले. कला आपल्याला अंतर्मुख करते. त्यातूनच आनंद आणि समधान मिळतेह्ण, असेही कामत म्हणाले.