शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

भारत सहिष्णू, मात्र द्वेष पसरवणा-यांना मोदींनी थांबवण्याची गरज - आमीर खान

By admin | Updated: March 5, 2016 20:16 IST

भारत सहिष्णू देश आहे, मात्र काही लोक द्वेष पसरवत आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगाम घालावा असं आवाहन अभिनेता आमीर खानने केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ५ - भारत सहिष्णू देश आहे, मात्र काही लोक द्वेष पसरवत आहेत त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगाम घालावा असं आवाहन अभिनेता आमीर खानने केलं आहे. भारत असहिष्णू आहे असं वक्तव्य केल्यानंतर आमीर खानवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती ज्यानंतर त्याला 'अतुल्य भारत'सहित सरकारच्या अनेक योजनांच्या बॅण्ड अॅम्बेसिडर पदावरुन हटवण्यात आलं होतं. सरकारने जरी मला काढून टाकलं असलं तरी आपण अजूनही देशाचा बॅण्ड अॅम्बेसिडर आहोत कारण भारत माझी माता आहे बँण्ड नाही असं आमीर खानने म्हणलं आहे. 
 
इंडिया टीव्हीवरील आप की अदालत या कार्यक्रमात आमीर खानने हे वक्तव्य केलं आहे. आपला देश सहिष्णू आहे, मात्र या देशात द्वेष पसरवणारे लोक खूप आहेत जे देशाचे तुकडे करणार अस म्हणत आहेत. सर्व धर्मात अशी लोक आहेत, त्यांना फक्त मोदीजी थांबवू शकतात. नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहेत आपण त्यांना सांगितलं पाहिजे असं आमीर खान बोलला आहे.
 
न्यायालयीन व्यवस्थेमुळे सुरक्षेची भावना निर्माण होते त्यामुळे जलद न्याय मिळण्याची गरज आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, कोणीही न्यायव्यवस्थेपेक्षा मोठा नाही. मात्र दुर्देवाने काही लोक आहेत जे द्वेष आणि नकारार्थी गोष्टी पसरवत आहेत. पंतप्रधानांनी देखील याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. त्यांची तर घोषणाचं आहे 'सबका साथ सबका विकास' असं आमीर खान या मुलाखतीदरम्यान बोलला आहे. 
माझ्या भारत असहिष्णू वक्तव्याला चुकीच्या अर्थाने घेतलं गेल्याचंही आमीर खान यावेळी बोलला. मी कधीच भारत असहिष्णू आहे असं बोललो नव्हतो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. असहिष्णूता वाढत आहे आणि असहिष्णू आहे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जरी सरकारने मला बॅण्ड अॅम्बेसिडर पदावरुन काढून टाकलं असलं तरी मी देशाचा बॅण्ड अॅम्बेसिडर राहणार. आपली भारतभुमी माझ्यासाठी माता आहे आणि ती बॅण्ड असू शकत नाही. माझ्या आईकडे मी बॅण्ड म्हणून कधीच पाहू शकत नाही. दुस-यांसाठी असेल पण माझ्यासाठी हा बॅण्ड नाही असं मत आमीर खानने व्यक्त केलं आहे.