शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

भारतात पाच वर्षात फेकावे लागले 6 लाख लिटर रक्त

By admin | Updated: April 24, 2017 08:22 IST

रक्त दानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित होत असतात.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 24 - रक्त शरीरातील महत्वाचा घटक असून रक्त दानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित होत असतात. रक्तदान पुण्यकर्म असल्याने नागरीकही शिबिरांमध्ये जाऊन मोठया संख्येने रक्तदान करतात. पण जमा होणारे रक्त साठवण्याची व्यवस्थाच अपुरी असल्यामुळे मोठया प्रमाणावर रक्त वाया जात आहे. रक्त साठवण्याच्या सुविधेअभावी मागच्या पाचवर्षात देशभरातील विविध ब्लड बँक्सना रक्ताचे 28 लाख युनिटस फेकून द्यावे लागले आहेत. 
 
चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेने ही माहिती दिली. रक्त साठवण्याच्या व्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी यानिमित्ताने समोर आल्या आहेत. लिटरमध्ये मोजायचे झाल्यास पाचवर्षात 6 लाख लिटर रक्त फेकून द्यावे लागले असून, पाण्याच्या 53 टँकर इतके हे प्रमाण आहे. 
 
देशभरात इतक्या मोठया प्रमाणावर रक्तदान होऊनही भारतात वर्षाला सरासरी रक्ताच्या 30 लाख युनिटसची कमतरता भासते. रक्त, प्लासमा, प्लेटलेटसच्या कमतरतेमुळे प्रसुती तसेच अपघातानंतर होणा-या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणइ तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक रक्त फेकून द्यावे लागते. रक्तबरोबर प्लासमा, लाल रक्तपेशी सुद्धा वाया जातात. 
 
प्लासमा, लाल रक्तपेशी हे आयुष्य वाचवणारे घटक आहेत.  पण मुदतीआधी त्यांचा वापर करता येत नाही. 2016-17 मध्ये रक्ताचे 6.57 लाख युनिटस फेकून द्यावे लागले. महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे जिथे वर्षाला 10 लाख युनिटसपेक्षा जास्त रक्त जमा होते. पण रक्त संचयाच्या सुविधेअभावी महाराष्ट्रातच सर्वात जास्त रक्त वाया जाते. ब्लड बँक आणि रुग्णालयांमध्ये ताळमेळ नसल्याने गरजेच्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही तसेच रक्तदान शिबिरांचा स्थानिक
 
राजकारणी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करतात. रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर झरीन भरुचा यांनी सांगितले की, 500 युनिटसपर्यंत रक्त जमा करा पण शिबिरांमध्ये 1 हजार ते 3 हजार युनिट रक्तजमा होते. पण इतके रक्त साठवण्याची व्यवस्था कुठे आहे ? त्यामुळे मोठया प्रमाणावर रक्तदान होऊनही गरजेच्यावेळी नागरीकांना रक्त तर उपलब्ध होत नाहीच पण लाखो लिटर रक्तही फेकून द्यावे लागत आहे.