शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

भारतात पाच वर्षात फेकावे लागले 6 लाख लिटर रक्त

By admin | Updated: April 24, 2017 08:22 IST

रक्त दानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित होत असतात.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 24 - रक्त शरीरातील महत्वाचा घटक असून रक्त दानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित होत असतात. रक्तदान पुण्यकर्म असल्याने नागरीकही शिबिरांमध्ये जाऊन मोठया संख्येने रक्तदान करतात. पण जमा होणारे रक्त साठवण्याची व्यवस्थाच अपुरी असल्यामुळे मोठया प्रमाणावर रक्त वाया जात आहे. रक्त साठवण्याच्या सुविधेअभावी मागच्या पाचवर्षात देशभरातील विविध ब्लड बँक्सना रक्ताचे 28 लाख युनिटस फेकून द्यावे लागले आहेत. 
 
चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेने ही माहिती दिली. रक्त साठवण्याच्या व्यवस्थेतील अनेक गंभीर त्रुटी यानिमित्ताने समोर आल्या आहेत. लिटरमध्ये मोजायचे झाल्यास पाचवर्षात 6 लाख लिटर रक्त फेकून द्यावे लागले असून, पाण्याच्या 53 टँकर इतके हे प्रमाण आहे. 
 
देशभरात इतक्या मोठया प्रमाणावर रक्तदान होऊनही भारतात वर्षाला सरासरी रक्ताच्या 30 लाख युनिटसची कमतरता भासते. रक्त, प्लासमा, प्लेटलेटसच्या कमतरतेमुळे प्रसुती तसेच अपघातानंतर होणा-या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणइ तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक रक्त फेकून द्यावे लागते. रक्तबरोबर प्लासमा, लाल रक्तपेशी सुद्धा वाया जातात. 
 
प्लासमा, लाल रक्तपेशी हे आयुष्य वाचवणारे घटक आहेत.  पण मुदतीआधी त्यांचा वापर करता येत नाही. 2016-17 मध्ये रक्ताचे 6.57 लाख युनिटस फेकून द्यावे लागले. महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे जिथे वर्षाला 10 लाख युनिटसपेक्षा जास्त रक्त जमा होते. पण रक्त संचयाच्या सुविधेअभावी महाराष्ट्रातच सर्वात जास्त रक्त वाया जाते. ब्लड बँक आणि रुग्णालयांमध्ये ताळमेळ नसल्याने गरजेच्यावेळी रक्त उपलब्ध होत नाही तसेच रक्तदान शिबिरांचा स्थानिक
 
राजकारणी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करतात. रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर झरीन भरुचा यांनी सांगितले की, 500 युनिटसपर्यंत रक्त जमा करा पण शिबिरांमध्ये 1 हजार ते 3 हजार युनिट रक्तजमा होते. पण इतके रक्त साठवण्याची व्यवस्था कुठे आहे ? त्यामुळे मोठया प्रमाणावर रक्तदान होऊनही गरजेच्यावेळी नागरीकांना रक्त तर उपलब्ध होत नाहीच पण लाखो लिटर रक्तही फेकून द्यावे लागत आहे.