शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

..तर भारत जागतिक लवाद केंद्र बनू शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 05:48 IST

इंडियन आरबिट्रेशन अँड कौन्सिलेशन अ‍ॅक्ट १९९६’ या कायद्यामध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणा चांगल्या असल्या तरी शासनाने न्यायदानाच्या प्रक्रियेतील दिरंगाई आणि त्रुटी दूर कराव्यात

‘मुंबई : ‘इंडियन आरबिट्रेशन अँड कौन्सिलेशन अ‍ॅक्ट १९९६’ या कायद्यामध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणा चांगल्या असल्या तरी शासनाने न्यायदानाच्या प्रक्रियेतील दिरंगाई आणि त्रुटी दूर कराव्यात. असे झाल्यास भारत जागतिक लवाद केंद्र बनू शकेल, असे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले.‘आंतरराष्ट्रीय लवाद यंत्रणेतील नवे कल’ या विषयासंदर्भात मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे नुकतेच एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचा प्रारंभ करताना ‘इंडसलॉ’ या संस्थेचे भागीदार लोकमेश किरण निंदुमुरी म्हणाले, की भारताची लवाद यंत्रणा भक्कम बनली तरच आपला देश आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र बनू शकेल. आपल्या कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेने जागतिक लवाद यंत्रणेशी जुळवून घेणे आवश्यक आहे. वादविवादांचा निपटारा करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपल्याकडील न्यायाधीशांनी संवेदनशीलता बाळगणे गरजेचे आहे. इंडियन आरबिट्रेशन अँड कौन्सिलेशन अ‍ॅक्टमध्ये सुधारणा झाल्या असल्या तरी त्याबाबत फारसे स्पष्टीकरण नसल्याने गोंधळ आहे, असे त्यांनी सांगितले. लवादाची प्रक्रिया उपलब्ध नसल्यास खासगी न्यायालये अशिलांमधील तंटे सोडविण्यास ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने मदत करील, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फिरोज बी. अंध्यरुजीना यांनी व्यक्त केले.संवाद पार्टनर्सच्या पौर्णिमा हत्ती म्हणाल्या की, लवाद प्रक्रियेचा वेग आता वाढविण्याची वेळ आली आहे. आॅनलाइन संवाद आणि दस्तऐवज सादर करण्याची पद्धत जागतिक पातळीवर मान्य झाली असल्यामुळे ती आपण स्वीकारायला हवी. (प्रतिनिधी)