शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

..तर भारत जागतिक लवाद केंद्र बनू शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 05:48 IST

इंडियन आरबिट्रेशन अँड कौन्सिलेशन अ‍ॅक्ट १९९६’ या कायद्यामध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणा चांगल्या असल्या तरी शासनाने न्यायदानाच्या प्रक्रियेतील दिरंगाई आणि त्रुटी दूर कराव्यात

‘मुंबई : ‘इंडियन आरबिट्रेशन अँड कौन्सिलेशन अ‍ॅक्ट १९९६’ या कायद्यामध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणा चांगल्या असल्या तरी शासनाने न्यायदानाच्या प्रक्रियेतील दिरंगाई आणि त्रुटी दूर कराव्यात. असे झाल्यास भारत जागतिक लवाद केंद्र बनू शकेल, असे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले.‘आंतरराष्ट्रीय लवाद यंत्रणेतील नवे कल’ या विषयासंदर्भात मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे नुकतेच एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचा प्रारंभ करताना ‘इंडसलॉ’ या संस्थेचे भागीदार लोकमेश किरण निंदुमुरी म्हणाले, की भारताची लवाद यंत्रणा भक्कम बनली तरच आपला देश आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र बनू शकेल. आपल्या कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेने जागतिक लवाद यंत्रणेशी जुळवून घेणे आवश्यक आहे. वादविवादांचा निपटारा करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता येणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपल्याकडील न्यायाधीशांनी संवेदनशीलता बाळगणे गरजेचे आहे. इंडियन आरबिट्रेशन अँड कौन्सिलेशन अ‍ॅक्टमध्ये सुधारणा झाल्या असल्या तरी त्याबाबत फारसे स्पष्टीकरण नसल्याने गोंधळ आहे, असे त्यांनी सांगितले. लवादाची प्रक्रिया उपलब्ध नसल्यास खासगी न्यायालये अशिलांमधील तंटे सोडविण्यास ‘फास्ट ट्रॅक’ पद्धतीने मदत करील, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फिरोज बी. अंध्यरुजीना यांनी व्यक्त केले.संवाद पार्टनर्सच्या पौर्णिमा हत्ती म्हणाल्या की, लवाद प्रक्रियेचा वेग आता वाढविण्याची वेळ आली आहे. आॅनलाइन संवाद आणि दस्तऐवज सादर करण्याची पद्धत जागतिक पातळीवर मान्य झाली असल्यामुळे ती आपण स्वीकारायला हवी. (प्रतिनिधी)