शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

भारत बटालियन-३चा तळ अहमदनगरला

By admin | Updated: January 21, 2016 03:40 IST

पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-३ चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे.

जमीर काझी,  मुंबईपश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-३ चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करुनही १०० एकरचा भूखंड न मिळाल्याने पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या मुख्यालयाच्या जागेला मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे नुकताच पाठविण्यात आला आहे. यापूर्वी कोल्हापूरातील जागेसाठी केलेले सर्व पत्रव्यवहार रद्द करण्याचे त्यात नमूद केले आहे.घातपाती कृत्य व नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांना तत्परतेने मदत देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) धर्तीवर भारतीय राखीव बटालियनचे तीन तळ राज्यात बनविण्यात येत आहेत. त्यापैकी एक कोल्हापूरात होणार होता, मात्र लोकप्रतिनिधींची अनास्था व प्रशासनाच्या दुर्लक्षामुुळे त्यासाठी आवश्यक १०० एकर जागा आजतागायत मिळू शकलेली नाही. त्यासाठी सुरुवातीला कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील मजले गावातील भूखंड निश्चित करण्यात आला होता. मात्र तो ५५ एकर असल्याने त्याला मंजुरी देण्यात आली नाही. त्यानंतर या तालुक्यातील रेंदाळ व करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथील विस्तीर्ण जागेबाबत चाचपणी करण्यात आली. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केल्याने ते प्रस्ताव रद्द करण्यात आले. त्यामुळे हा तळ अखेर अहमदनगरमधील मिरजगाव येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाशिक विभागीय आयुक्तालयाने त्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘२६/११’नंतर राज्य सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने औरंगाबाद, गोंदिया व कोल्हापुरात भारतीय राखीव बटालियन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी औरंगाबाद येथील बटालियनला जागा मिळाली आहे. गोंदिया व कोल्हापूरातील जागेचे घोंगडे भिजत पडले आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे ७५० जवानांसह एकूण एक हजार मनुष्यबळ असणार आहे. त्यांना अद्यावत प्रशिक्षण व शस्त्रे दिली जातील. तिन्ही बटालियनसाठी गेल्यावर्षी भरतीची प्रक्रिया पार पडली आहे. कोल्हापूर बटालियनसाठी निवडण्यात आलेले जवान सध्या दौंडमध्ये आहेत.