शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

भारत बटालियन-३चा तळ अहमदनगरला

By admin | Updated: January 21, 2016 03:40 IST

पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-३ चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे.

जमीर काझी,  मुंबईपश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-३ चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करुनही १०० एकरचा भूखंड न मिळाल्याने पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या मुख्यालयाच्या जागेला मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे नुकताच पाठविण्यात आला आहे. यापूर्वी कोल्हापूरातील जागेसाठी केलेले सर्व पत्रव्यवहार रद्द करण्याचे त्यात नमूद केले आहे.घातपाती कृत्य व नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांना तत्परतेने मदत देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) धर्तीवर भारतीय राखीव बटालियनचे तीन तळ राज्यात बनविण्यात येत आहेत. त्यापैकी एक कोल्हापूरात होणार होता, मात्र लोकप्रतिनिधींची अनास्था व प्रशासनाच्या दुर्लक्षामुुळे त्यासाठी आवश्यक १०० एकर जागा आजतागायत मिळू शकलेली नाही. त्यासाठी सुरुवातीला कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील मजले गावातील भूखंड निश्चित करण्यात आला होता. मात्र तो ५५ एकर असल्याने त्याला मंजुरी देण्यात आली नाही. त्यानंतर या तालुक्यातील रेंदाळ व करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथील विस्तीर्ण जागेबाबत चाचपणी करण्यात आली. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केल्याने ते प्रस्ताव रद्द करण्यात आले. त्यामुळे हा तळ अखेर अहमदनगरमधील मिरजगाव येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाशिक विभागीय आयुक्तालयाने त्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘२६/११’नंतर राज्य सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने औरंगाबाद, गोंदिया व कोल्हापुरात भारतीय राखीव बटालियन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी औरंगाबाद येथील बटालियनला जागा मिळाली आहे. गोंदिया व कोल्हापूरातील जागेचे घोंगडे भिजत पडले आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे ७५० जवानांसह एकूण एक हजार मनुष्यबळ असणार आहे. त्यांना अद्यावत प्रशिक्षण व शस्त्रे दिली जातील. तिन्ही बटालियनसाठी गेल्यावर्षी भरतीची प्रक्रिया पार पडली आहे. कोल्हापूर बटालियनसाठी निवडण्यात आलेले जवान सध्या दौंडमध्ये आहेत.