शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

भारत बटालियन-३चा तळ अहमदनगरला

By admin | Updated: January 21, 2016 03:40 IST

पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-३ चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे.

जमीर काझी,  मुंबईपश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत राखीव बटालियन-३ चे कोल्हापुरातील तळ (मुख्यालय) आता अहमदनगर जिल्ह्यातील मौजे मिरजगाव येथे स्थलांतरित केले जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करुनही १०० एकरचा भूखंड न मिळाल्याने पोलीस महासंचालकांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या मुख्यालयाच्या जागेला मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे नुकताच पाठविण्यात आला आहे. यापूर्वी कोल्हापूरातील जागेसाठी केलेले सर्व पत्रव्यवहार रद्द करण्याचे त्यात नमूद केले आहे.घातपाती कृत्य व नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांना तत्परतेने मदत देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) धर्तीवर भारतीय राखीव बटालियनचे तीन तळ राज्यात बनविण्यात येत आहेत. त्यापैकी एक कोल्हापूरात होणार होता, मात्र लोकप्रतिनिधींची अनास्था व प्रशासनाच्या दुर्लक्षामुुळे त्यासाठी आवश्यक १०० एकर जागा आजतागायत मिळू शकलेली नाही. त्यासाठी सुरुवातीला कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील मजले गावातील भूखंड निश्चित करण्यात आला होता. मात्र तो ५५ एकर असल्याने त्याला मंजुरी देण्यात आली नाही. त्यानंतर या तालुक्यातील रेंदाळ व करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथील विस्तीर्ण जागेबाबत चाचपणी करण्यात आली. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केल्याने ते प्रस्ताव रद्द करण्यात आले. त्यामुळे हा तळ अखेर अहमदनगरमधील मिरजगाव येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाशिक विभागीय आयुक्तालयाने त्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘२६/११’नंतर राज्य सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने औरंगाबाद, गोंदिया व कोल्हापुरात भारतीय राखीव बटालियन स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी औरंगाबाद येथील बटालियनला जागा मिळाली आहे. गोंदिया व कोल्हापूरातील जागेचे घोंगडे भिजत पडले आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे ७५० जवानांसह एकूण एक हजार मनुष्यबळ असणार आहे. त्यांना अद्यावत प्रशिक्षण व शस्त्रे दिली जातील. तिन्ही बटालियनसाठी गेल्यावर्षी भरतीची प्रक्रिया पार पडली आहे. कोल्हापूर बटालियनसाठी निवडण्यात आलेले जवान सध्या दौंडमध्ये आहेत.