शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय

By admin | Updated: December 27, 2016 04:34 IST

राज्यातील इतर मागासवर्गीय समाजांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी याबाबतचा

- यदु जोशी, मुंबई

राज्यातील इतर मागासवर्गीय समाजांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचना आज मुख्यमंत्री कार्यालयाकडून सामाजिक न्याय विभागाला देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सामाजिक न्याय आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यासाठी लगबग सुरू होती. या विभागासाठी तातडीने काही आर्थिक तरतूद करून मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव तरतूद केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. इतर मागासवर्गीयांमध्ये मोडणाऱ्या ४०० जाती त्याशिवाय, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात मोडणाऱ्या सर्व जातींसाठी हे मंत्रालय कार्यरत राहील. या सर्व जातींना मिळून सध्या ३२ टक्के आरक्षण आहे. मराठा समाजाच्या कल्याणासाठी विविध घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच केल्या आहेत. स्वतंत्र मंत्रालय देऊन आता ते ओबीसी समाजाला नववर्षाची भेट देणार आहेत. सध्या ओबीसी आर्थिक विकास महामंडळ आणि श्यामराव पेजे कोकण विकास महामंडळ हे मुख्यत्वे ओबीसींच्या विकासासाठी कार्यरत आहेत. तर विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या कल्याणासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास मंडळ हे सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत आहेत. यापुढे ते ओबीसी मंत्रालयांतर्गत कार्यरत राहतील. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे अशी ठाम भूमिका स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनीच सुरुवातीपासून घेतली आहे. विधिमंडळाच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेत तसे आश्वासनदेखील त्यांनी दिले होते. त् मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा पश्चिम नागपूरचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. सध्या ते दक्षिण-पश्चिम नागपूरचे दुसऱ्यांदा आमदार आहेत. या दोन्ही ठिकाणी ओबीसींची संख्या मोठी असून मुख्यमंत्र्यांचे राजकारण सुरुवातीपासून ओबीसी केंद्रीत राहिले आहे. स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची नीट घडी बसेपर्यंत मुख्यमंत्री हा विभाग स्वत:कडेच ठेवतील, अशी शक्यता आहे. - जि.प., पंचायत समिती निवडणुकांवर नजर!जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाचा निर्णय भाजपासाठी राजकीयदृष्ट्या फायद्याचा ठरेल, असे मानले जाते.