शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

गोधनामुळे उत्पन्न वाढते

By admin | Updated: April 21, 2015 01:03 IST

गाय व बैल हे उपयुक्त प्राणी असून, पारंपरिक शेतीमध्ये आजही गोधनाचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्न वाढत असून, त्यांचे संरक्षण करणे

मुंबई : गाय व बैल हे उपयुक्त प्राणी असून, पारंपरिक शेतीमध्ये आजही गोधनाचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्न वाढत असून, त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असा दावा करणारे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केले़पशुसंवर्धन विभागाच्या उपसचिव चित्रकला सूर्यवंशी यांनी सरकारच्या वतीने हे प्रतिज्ञापत्र सादर केले़ पशुसंवर्धन व संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे़ गाय व बैल यांचा शेतीसाठी वापर केला जातो़ कितीही अत्याधुनिक यंत्रे आली तरी या गोधनाच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिकच आहे़ गायीपासून मिळणाऱ्या दुधासारखे दुसरे पौष्टिक अन्न नाही़ त्यामुळे या प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यकच असल्याने राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. न्यायालयात दाखल झालेली जनहित याचिका ही केवळ गोमांस खाण्यास मुभा मिळण्यासाठी करण्यात आली आहे़ यासाठी गोमांस परराज्यातून आणण्यास परवानगी द्यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे़ या बंदीने राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप आहे़ (प्रतिनिधी)