शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

गोधनामुळे उत्पन्न वाढते

By admin | Updated: April 21, 2015 01:03 IST

गाय व बैल हे उपयुक्त प्राणी असून, पारंपरिक शेतीमध्ये आजही गोधनाचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्न वाढत असून, त्यांचे संरक्षण करणे

मुंबई : गाय व बैल हे उपयुक्त प्राणी असून, पारंपरिक शेतीमध्ये आजही गोधनाचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्न वाढत असून, त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असा दावा करणारे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केले़पशुसंवर्धन विभागाच्या उपसचिव चित्रकला सूर्यवंशी यांनी सरकारच्या वतीने हे प्रतिज्ञापत्र सादर केले़ पशुसंवर्धन व संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे़ गाय व बैल यांचा शेतीसाठी वापर केला जातो़ कितीही अत्याधुनिक यंत्रे आली तरी या गोधनाच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिकच आहे़ गायीपासून मिळणाऱ्या दुधासारखे दुसरे पौष्टिक अन्न नाही़ त्यामुळे या प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यकच असल्याने राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. न्यायालयात दाखल झालेली जनहित याचिका ही केवळ गोमांस खाण्यास मुभा मिळण्यासाठी करण्यात आली आहे़ यासाठी गोमांस परराज्यातून आणण्यास परवानगी द्यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे़ या बंदीने राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप आहे़ (प्रतिनिधी)