शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

गोधनामुळे उत्पन्न वाढते

By admin | Updated: April 21, 2015 01:03 IST

गाय व बैल हे उपयुक्त प्राणी असून, पारंपरिक शेतीमध्ये आजही गोधनाचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्न वाढत असून, त्यांचे संरक्षण करणे

मुंबई : गाय व बैल हे उपयुक्त प्राणी असून, पारंपरिक शेतीमध्ये आजही गोधनाचा वापर केला जातो. यामुळे महाराष्ट्राचे उत्पन्न वाढत असून, त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असा दावा करणारे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केले़पशुसंवर्धन विभागाच्या उपसचिव चित्रकला सूर्यवंशी यांनी सरकारच्या वतीने हे प्रतिज्ञापत्र सादर केले़ पशुसंवर्धन व संरक्षण ही सरकारची जबाबदारी आहे़ गाय व बैल यांचा शेतीसाठी वापर केला जातो़ कितीही अत्याधुनिक यंत्रे आली तरी या गोधनाच्या मदतीने पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिकच आहे़ गायीपासून मिळणाऱ्या दुधासारखे दुसरे पौष्टिक अन्न नाही़ त्यामुळे या प्राण्यांचे संरक्षण करणे आवश्यकच असल्याने राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे. न्यायालयात दाखल झालेली जनहित याचिका ही केवळ गोमांस खाण्यास मुभा मिळण्यासाठी करण्यात आली आहे़ यासाठी गोमांस परराज्यातून आणण्यास परवानगी द्यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे़ या बंदीने राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा याचिकाकर्त्याचा आरोप आहे़ (प्रतिनिधी)