शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

वैद्यकीय प्रवेशासाठी चुरस वाढणार

By admin | Updated: June 11, 2016 04:15 IST

राज्यातील शासकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगणार आहे

मुंबई : राज्यातील शासकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगणार आहे. खासगी आणि अभिमत महाविद्यालयांतील प्रवेश यंदापासून नीट परीक्षेद्वारे होणार असल्याने शासकीय महाविद्यालयांतील कट आॅफ भलताच वाढणार असल्याची चर्चा आहे. गेल्यावर्षी लागलेल्या कट आॅफमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी केईएम आणि बीडीएससाठी सेंट जॉर्ज महाविद्यालयाची कट आॅफ सर्वाधिक गुणांवर स्थिरावली होती.एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा मुंबईतील केईएम, नायर, जेजे आणि सायन रुग्णालयांवर असतात. यावर्षी राज्यातील शासकीय महाविद्यालयांत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ २ हजार ८१० जागा उपलब्ध आहेत. याउलट प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४६ हजार ७९७ इतकी आहे. परिणामी उपलब्ध जागांसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे एका जागेसाठी सुमारे १७ विद्यार्थी इतके आहे. मुंबईत केईएम आणि जेजे यांचा नावलौकिक अधिक असला, तरी नायर आणि सेंट जॉर्ज या महाविद्यालयांची गुणवत्ता यादी सर्वाधिक गुणांवर स्थिरावली होती. त्यामुळे यंदाही येथील जागांसाठी चुरस असेल, यात शंका नाही.मुंबईसह पुण्यातील बीजेएमसी महाविद्यालयालाही विद्यार्थ्यांची अधिक पसंती मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी २०० गुण मिळालेल्या एकमेव विद्यार्थ्याने पुण्यातील बीजेएमसी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. बीजेएमसीची गुणवत्ता यादी १८० गुणांवर स्थिरावली होती, तर गुणवत्ता यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या विद्यार्थ्याने मुंबईतील केईएम महाविद्यालयाला पसंती दर्शवली होती. त्याला १९९ गुण होते.>खासगीची वाट बिकट!याआधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांसमोर खासगी महाविद्यालयांचा पर्याय होता. मात्र यावर्षी सीईटीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी नीटचा खडतर प्रवास करावा लागणार आहे.त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांऐवजी त्यांचा पर्याय यंदा आयर्वेद, होमिआपॅथिक अभ्यासक्रमांना मिळू शकते. म्हणून यंदा आयुर्वेद आणि होमिओपॅथिक अभ्यासक्रमांची कट आॅफ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही....म्हणून चुरस रंगणारगेल्यावर्षी उपलब्ध जागांसाठी केवळ ३९ हजार ३२८ विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र यंदा पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत ७ हजार ४६९ची वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. परिणामी ४६ हजार ७९७ विद्यार्थ्यांत प्रवेशासाठी ‘कांटे की टक्कर’ होईल, यात शंकाच नाही.