शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वैद्यकीय प्रवेशासाठी चुरस वाढणार

By admin | Updated: June 11, 2016 04:15 IST

राज्यातील शासकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगणार आहे

मुंबई : राज्यातील शासकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगणार आहे. खासगी आणि अभिमत महाविद्यालयांतील प्रवेश यंदापासून नीट परीक्षेद्वारे होणार असल्याने शासकीय महाविद्यालयांतील कट आॅफ भलताच वाढणार असल्याची चर्चा आहे. गेल्यावर्षी लागलेल्या कट आॅफमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी केईएम आणि बीडीएससाठी सेंट जॉर्ज महाविद्यालयाची कट आॅफ सर्वाधिक गुणांवर स्थिरावली होती.एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा मुंबईतील केईएम, नायर, जेजे आणि सायन रुग्णालयांवर असतात. यावर्षी राज्यातील शासकीय महाविद्यालयांत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ २ हजार ८१० जागा उपलब्ध आहेत. याउलट प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४६ हजार ७९७ इतकी आहे. परिणामी उपलब्ध जागांसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे एका जागेसाठी सुमारे १७ विद्यार्थी इतके आहे. मुंबईत केईएम आणि जेजे यांचा नावलौकिक अधिक असला, तरी नायर आणि सेंट जॉर्ज या महाविद्यालयांची गुणवत्ता यादी सर्वाधिक गुणांवर स्थिरावली होती. त्यामुळे यंदाही येथील जागांसाठी चुरस असेल, यात शंका नाही.मुंबईसह पुण्यातील बीजेएमसी महाविद्यालयालाही विद्यार्थ्यांची अधिक पसंती मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी २०० गुण मिळालेल्या एकमेव विद्यार्थ्याने पुण्यातील बीजेएमसी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. बीजेएमसीची गुणवत्ता यादी १८० गुणांवर स्थिरावली होती, तर गुणवत्ता यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या विद्यार्थ्याने मुंबईतील केईएम महाविद्यालयाला पसंती दर्शवली होती. त्याला १९९ गुण होते.>खासगीची वाट बिकट!याआधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांसमोर खासगी महाविद्यालयांचा पर्याय होता. मात्र यावर्षी सीईटीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी नीटचा खडतर प्रवास करावा लागणार आहे.त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांऐवजी त्यांचा पर्याय यंदा आयर्वेद, होमिआपॅथिक अभ्यासक्रमांना मिळू शकते. म्हणून यंदा आयुर्वेद आणि होमिओपॅथिक अभ्यासक्रमांची कट आॅफ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही....म्हणून चुरस रंगणारगेल्यावर्षी उपलब्ध जागांसाठी केवळ ३९ हजार ३२८ विद्यार्थी पात्र ठरले होते. मात्र यंदा पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत ७ हजार ४६९ची वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के अधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. परिणामी ४६ हजार ७९७ विद्यार्थ्यांत प्रवेशासाठी ‘कांटे की टक्कर’ होईल, यात शंकाच नाही.