शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या मापदंडामुळेच स्त्रियांवरील अत्याचार वाढलेत

By admin | Updated: July 31, 2014 01:07 IST

पुरातन काळापासून समाजाने स्त्रियांसाठी अन् पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड लावलेले आहेत. हे मापदंड स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला तडा देतात. या मापदंडामुळेच समाजात स्त्रियांवरील अत्याचार

मान्यवरांचे प्रतिपादन : ‘पुरुषी नैतिकता : स्त्री अत्याचाराचे खरे कारण’ परिसंवादनागपूर : पुरातन काळापासून समाजाने स्त्रियांसाठी अन् पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड लावलेले आहेत. हे मापदंड स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला तडा देतात. या मापदंडामुळेच समाजात स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि आकांक्षा प्रकाशन नागपूरच्यावतीने शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात ‘पुरुषी नैतिकता : स्त्री अत्याचाराचे खरे कारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्त्री शक्तीच्या विभाग अध्यक्ष अरुणा सबाने होत्या.परिसंवादात डॉ. कुमार शास्त्री, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. मनिषा कोठेकर सहभागी झाल्या होत्या. डॉ. मनिषा कोठेकर म्हणाल्या, नैतिक मूल्य शाश्वत आहेत. समाजाच्या मापदंडामुळे अनेकदा कनिष्ठ असलेली स्त्री अत्याचाराला बळी पडते. पुरुष-स्त्रीकडे पाहण्याची भेदभावाची दृष्टी अत्याचाराला जन्म देते. जन्मच नाकारणे ही स्त्रियांवरील अत्याचाराची सुरुवात आहे. पुरुषापेक्षा कनिष्ठ असलेल्या स्त्रीने आपल्यापोटी जन्म घेऊ नये, असे सर्वांनाच वाटते. त्यातूनच स्त्री भ्रूणहत्या वाढली. मुलापेक्षा मुलीला कमी खायला देऊन त्यांना कुपोषित करणे, कामाचा बोजा, अकाली विवाह, मातृत्व, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, मृत्यू हे स्त्रियांवरील अत्याचाराचे विविध प्रकार त्यांनी सांगितले. स्त्रियांवरील अत्याचारामुळे आपण पुरुषांपेक्षा कनिष्ठ असल्याची स्त्रियांची मानसिकता बनली असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, सार्वजनिक आणि खाजगी असे स्त्री अत्याचाराचे क्षेत्र आहेत. दलित, आदिवासी महिलांवरील अत्याचार, वैयक्तिक, खाजगी, राजकीय स्वार्थ, धार्मिक, सांस्कृतिक कारणातून स्त्री अत्याचार घडतात. यामागे पुरुषी सत्तेचा दृष्टिकोन कारणीभूत आहे. दलितालाही आपली पत्नी कनिष्ठ वाटते. अन्याय होणाऱ्या स्त्रीला आपल्यावर अन्याय होत नाही असे वाटण्याचे कारणही पुरुषी वृत्तीच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. कुमार शास्त्री यांनी स्त्री अत्याचारात मानसिकता महत्त्वाची असल्याचे सांगून स्त्रीने गुलामगिरीची मानसिकता का स्वीकारली याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.डॉ. अरुणा सबाने यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचालन सुजाता लोखंडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. परिसंवादाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)