शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

समाजाच्या मापदंडामुळेच स्त्रियांवरील अत्याचार वाढलेत

By admin | Updated: July 31, 2014 01:07 IST

पुरातन काळापासून समाजाने स्त्रियांसाठी अन् पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड लावलेले आहेत. हे मापदंड स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला तडा देतात. या मापदंडामुळेच समाजात स्त्रियांवरील अत्याचार

मान्यवरांचे प्रतिपादन : ‘पुरुषी नैतिकता : स्त्री अत्याचाराचे खरे कारण’ परिसंवादनागपूर : पुरातन काळापासून समाजाने स्त्रियांसाठी अन् पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मापदंड लावलेले आहेत. हे मापदंड स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला तडा देतात. या मापदंडामुळेच समाजात स्त्रियांवरील अत्याचार वाढले आहेत, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि आकांक्षा प्रकाशन नागपूरच्यावतीने शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात ‘पुरुषी नैतिकता : स्त्री अत्याचाराचे खरे कारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्त्री शक्तीच्या विभाग अध्यक्ष अरुणा सबाने होत्या.परिसंवादात डॉ. कुमार शास्त्री, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. मनिषा कोठेकर सहभागी झाल्या होत्या. डॉ. मनिषा कोठेकर म्हणाल्या, नैतिक मूल्य शाश्वत आहेत. समाजाच्या मापदंडामुळे अनेकदा कनिष्ठ असलेली स्त्री अत्याचाराला बळी पडते. पुरुष-स्त्रीकडे पाहण्याची भेदभावाची दृष्टी अत्याचाराला जन्म देते. जन्मच नाकारणे ही स्त्रियांवरील अत्याचाराची सुरुवात आहे. पुरुषापेक्षा कनिष्ठ असलेल्या स्त्रीने आपल्यापोटी जन्म घेऊ नये, असे सर्वांनाच वाटते. त्यातूनच स्त्री भ्रूणहत्या वाढली. मुलापेक्षा मुलीला कमी खायला देऊन त्यांना कुपोषित करणे, कामाचा बोजा, अकाली विवाह, मातृत्व, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, मृत्यू हे स्त्रियांवरील अत्याचाराचे विविध प्रकार त्यांनी सांगितले. स्त्रियांवरील अत्याचारामुळे आपण पुरुषांपेक्षा कनिष्ठ असल्याची स्त्रियांची मानसिकता बनली असल्याचे त्या म्हणाल्या. डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, सार्वजनिक आणि खाजगी असे स्त्री अत्याचाराचे क्षेत्र आहेत. दलित, आदिवासी महिलांवरील अत्याचार, वैयक्तिक, खाजगी, राजकीय स्वार्थ, धार्मिक, सांस्कृतिक कारणातून स्त्री अत्याचार घडतात. यामागे पुरुषी सत्तेचा दृष्टिकोन कारणीभूत आहे. दलितालाही आपली पत्नी कनिष्ठ वाटते. अन्याय होणाऱ्या स्त्रीला आपल्यावर अन्याय होत नाही असे वाटण्याचे कारणही पुरुषी वृत्तीच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. कुमार शास्त्री यांनी स्त्री अत्याचारात मानसिकता महत्त्वाची असल्याचे सांगून स्त्रीने गुलामगिरीची मानसिकता का स्वीकारली याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.डॉ. अरुणा सबाने यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचालन सुजाता लोखंडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. परिसंवादाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)