शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

वाढत्या जलपर्णीचा आरोग्याला धोका

By admin | Updated: April 6, 2017 00:57 IST

पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णीने फोफावलेले पाणी मेल्यासारखे दिसू लागते

कोरेगाव मूळ : पाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णीने फोफावलेले पाणी मेल्यासारखे दिसू लागते. मुळा-मुठा नदीपात्रामध्ये वाढलेल्या जलपर्णीमुुळे नदीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढीस लागल्या आहेत. मुळा-मुठा नदीवरील कोरेगाव मूळ व बिवरी (ता. हवेली) गावांच्या दरम्यान असलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर जलपर्णीची वाढ झालेली आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. नदीपात्रातील दूषित पाण्यावर तयार होणारे डास, मच्छर आदी उपद्रवी कीटकांमुळे नागरिकांना ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशा अनेक साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. सायंकाळी परिसरात डासांचा उपद्रव वाढला आहे. जलपर्णीचा वाढता विळखा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातून उत्पत्ती होणाऱ्या डासांचा व चिलटांचा उपद्रव नदीकाठच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी! जलपर्णीच्या संकटाने तर सर्वच नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. विशेषत: हिवाळा संपता संपता ती नद्यांचा ताबा घेते आणि मग पावसाळ्यापर्यंत तिचेच राज्य असते. खरेतर हे स्वाभाविक आहे. दूषित पाणी, त्यात नायट्रेट-फॉस्फेटचा भरपूर अंश आणि वरून भरपूर सूर्यप्रकाश जलपर्णीला फोफावायला आणखी काय हवे? कितीही काढली तरी ती वाढतच राहते, कारण नदीच्या पात्रात तिचे खाद्य वाढून ठेवलेले असते.तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी येथील बंधाऱ्यातून पाणी उपसा केला जातो. पाणी उपश्यासाठी असलेल्या विद्युत पंपांमध्ये नेहमी जलपर्णी अडकत असल्याने अनेकदा उपसा सिंचन योजना बंद ठेवावी लागते. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजनेचा लाभ कमी प्रमाणात होत आहे. (वार्ताहर)>सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी : खड्डे भरावेपुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतून मुळा-मुठा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडावे. जलसंपदा विभागाने तातडीने लक्ष देऊन नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी कोरेगाव मूळच्या सरपंच रोहिणी कानकाटे व उपसरपंच लोकेश कानकाटे यांनी केली. तसेच, लघुपाटबंधारे विभागाने येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याला संरक्षण कठडे बसवावेत, बंधाऱ्यावरील उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी व बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीसाठी धोकादायक असलेले खड्डे भरून घ्यावेत, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.