शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

वाढीव संपत्तीची माहिती देणे बंधनकारक होणार

By admin | Updated: January 21, 2017 00:35 IST

लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधीची निवड करताना त्याच्याविषयीची सर्व माहिती मतदाराला असावी

नाशिक : लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधीची निवड करताना त्याच्याविषयीची सर्व माहिती मतदाराला असावी यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता महापालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना प्रतिज्ञापत्राद्वारे स्वत:ची माहिती जाहीर करावी लागणार असून, यापूर्वी जर निवडणूक लढविलेली असेल तर अशा लोकप्रतिनिधींना गेल्या निवडणुकीच्या वेळी नमूद केलेल्या संपत्तीची व सध्याच्या संपत्तीची माहितीदेखील जनतेसाठी खुली करावी लागणार आहे. आयोगाच्या या निर्णयाने लोकप्रतिनिधी झाल्यानंतर संपत्तीत वाढ झालेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, जनतेमध्येही उमेदवारांच्या मालमत्तेविषयी उत्सुकता वाढीस लागली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात आदेश काढून उमेदवाराने नामांकन सादर करताना द्यावयाच्या शपथपत्रात काही बदल सुचविले असून, होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने उमेदवाराचे वय, शिक्षण, व्यवसाय, अपत्यांची संख्या, दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीकरिता शिक्षा होऊ शकेल अशा प्रलंबित प्रकरणांची संख्या, ज्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आलेले आहे आणि एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे अशा प्रकरणांची संख्या, उमेदवाराचा पॅन क्रमांक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचा तपशील, कुटुंबाच्या स्थावर मालमत्तेचा तपशील, एकूण मालमत्ता, देय असलेल्या सार्वजनिक वित्तीय संस्थांकडील दायित्वे, थकीत रकमा याची माहिती उमेदवारांना शपथपत्रावर द्यावी लागणार आहे. अलीकडेच राज्य आयोगाने उमेदवारांची संपूर्ण माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यात प्रामुख्याने उमेदवारावर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची माहिती मतदारांना व्हावी व त्यांनी सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करावे असा त्यामागचा हेतू आहे. त्याचबरोबर उमेदवाराने यापूर्वी लढविलेल्या निवडणुकीच्या वेळी दाखविलेल्या संपत्तीची माहितीही आयोगाने सक्तीची केली आहे. ज्यांनी निवडणूक लढविली व पराभूत झाले त्यांना या माहितीविषयी आक्षेप असण्याचे कारण नसले तरी, गेल्या निवडणुकीत विजय मिळविलेल्या व सत्ता भोगलेल्यांनी मात्र त्याचा धसका घेतला आहे. आयोगाने गेल्या निवडणुकीत उमेदवाराने संपत्तीचे दिलेले विवरण व सध्या असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचे मूल्य जाहीर करण्याची अट उमेदवारांना घातली आहे. (प्रतिनिधी)