शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

विजेचे वाढते विघ्न!

By admin | Updated: August 29, 2014 03:46 IST

रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजांमध्ये एका मर्यादेच्या पलीकडे खासगीकरण आणले की त्याचे भविष्यात काय दुष्परिणाम होऊ शकतात याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली आहे

अतुल कुलकर्णी, मुंबईरस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजांमध्ये एका मर्यादेच्या पलीकडे खासगीकरण आणले की त्याचे भविष्यात काय दुष्परिणाम होऊ शकतात याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली आहे. ठरलेल्या दरापेक्षा जादा दर देण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे वीजच उपलब्ध होणार नाही. याचा पहिला फटका बुधवारी नरेंद्र मोदींच्या गुजरातला बसला! दुसरा फटका महाराष्ट्राला बसेल या चिंतेने निवडणुकीच्या तोंडावर राजकारण्यांचे धाबे दणाणले आहे.सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे वीज वितरणाची जबाबदारी असणाऱ्या सर्व कंपन्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. त्यातच अदानी ग्रुपची २९९० मेगावॅट तर टाटाची १६०० मेगावॅट वीजनिर्मिती तांत्रिक कारणामुळे थांबली आहे. या सगळ्याच्या पाठीमागे सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मुळात त्या-त्या सरकारांनी रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजेच्या क्षेत्रात स्वत: गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले असते तर आज खासगी कंपन्यांच्या तालावर नाचणे अशा सरकारांच्या नशिबी आले नसते.