शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

दारिद्ररेषेखालील लोकसंख्या का वाढतेय?

By admin | Updated: March 31, 2015 03:54 IST

महाराष्ट्रात दारिद्र रेषेखालील नागरिकांची लोकसंख्या का वाढत चालली आहे, असा सवाल करत या नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचत आहेत की नाही?

मुंबई: महाराष्ट्रात दारिद्र रेषेखालील नागरिकांची लोकसंख्या का वाढत चालली आहे, असा सवाल करत या नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचत आहेत की नाही? याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले आहेत़याप्रकरणी एका सामाजिक संघटनेने जनहित याचिका केली आहे़ दारिद्रय रेषेखालील नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे़ न्या़ नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ २००१ साली झालेल्या जनगणनेत ६६ लाख जण दारिद्रय रेषेखाली होते़ २०११ च्या जनगणेत हा आकडा १़७७ लाखांवर पोहोचला आहे़ २०१३ मध्ये अन्न सुरक्षा कायदा मंजूर झाला़ याअंतर्गत प्रत्येक राज्यात अन्न आयोग स्थापन होणे बंधनकारक आहे़ महाराष्ट्रात याची स्थापना झालेली नाही, असा आरोप अ‍ॅड़ गायत्री सिंग यांनी केला़त्याची दखल घेत न्यायालयाने शासनाला चांगलेच धारेवर धरले़ जनगणना नेमकी कोणत्या आधारावर केली गेली आहे़ दारिद्रय रेषेखालील नागरिकांची संख्या एवढी कशी वाढली व याचे नेमके कारण काय आहे़ तसेच अन्न आयोग स्थापन झाला आहे की नाही याचा खुलासा शासनाने येत्या दोन आठवड्यात करावा, असे आदेश देऊन न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)