शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

‘राज्यराणी’चे डबे वाढल्याने कोकणवासीयांच्या अपेक्षा वाढल्या

By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST

कोकण रेल्वे : अनेक वर्षांच्या मागण्यांना मूर्त स्वरूप येणार?

सुभाष कदम - चिपळूण -जनशताब्दी व राज्यराणी एक्स्प्रेस या गाड्यांना डबे वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. पैकी दादर - सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेसला १४ऐवजी १७ डबे कायमस्वरुपी करण्याचा निर्णय झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने कोकणवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरेश प्रभू यांच्यासारखा अभ्यासू रेल्वेमंत्री कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळणार आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, नवीन गाड्या सुरु करण्याबाबत नागरिकांची मागणी आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे कोकणवासीयांसाठी शोभेची ठरली आहे. रेल्वेमुळे कोकणचा विकास किंवा पर्यटनवृद्धी झाली नाही. कोकणात येणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसचे डब्बे वाढविण्याची घोषणा २० महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. तिची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे. आता जनशताब्दी एक्स्प्रेसला ५ जनरल कोच लावावे किंवा ३ सेमी असे १८ डबे जोडण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळे नाराजी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, या हेतूने गणपती स्पेशल म्हणून १० दिवस रत्नागिरी-वसईरोड ही गाडी सुरु करण्यात आली होती. ही गाडी दररोज किंवा ३ दिवसांनी सुरु करावी, अशी मागणी आहे.रत्नागिरी ते वसईसाठी सकाळी ५ वाजता ती सुटेल, तर वसई रोडवरुन रत्नागिरीसाठी रात्री ९ वाजता निघेल. नव्याने सुरु होणाऱ्या थिरुअनंतरपूरम - निजामुद्दिन या नव्या एक्स्प्रेससह इतर १५ एक्स्प्रेसला चिपळूण येथे थांबा मिळावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. चिपळूण - कऱ्हाड हा अत्यंत महत्त्वाचा रेल्वेमार्ग सुरु झाल्यास कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल. शिवाय अनेक गाड्या कऱ्हाडमार्गे पुणेकडे जातील. या मार्गाचा विचार रेल्वे अर्थसंकल्पात झालेला नाही. परंतु, आता रेल्वेमंत्री प्रभू हे या मार्गाबाबत ठोस निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. कोकणासाठी मंत्री प्रभू हे झुकते माप देतील, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरी-पुणे रत्नागिरी वसईरोड दररोज, तर अजमेर - मडगाव, पनवेल बंगलोर या दोन दिवसांनी गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी आहे. आता या मागण्याही कधी पूर्ण होतात, याकडे कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.कोकण रेल्वेच्या विविध समस्यांबाबत गेले ५ वर्ष पत्रव्यवहार करुनही रेल्वे मंत्रालय दाद देत नाही. आतापर्यंत ५ वर्षात ममता बॅनर्जी, दिनेश त्रिवेदी, मुकूल रॉय, सी.पी.जोशी, पवनकुमार बन्सल, मल्लिकार्जुन खर्गे, डी.व्ही. सदानंद गौडा हे मंत्री होवून गेले तर आता सुरेश प्रभू आरुढ आहेत. ५ वर्षात ८ मंत्री या खात्याने पाहिले. परंतु, कोकणवासियांना यांनी न्याय दिला नाही. आता प्रभू मंत्री झाल्याने ते आपल्या भागाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे.सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने कोकणवासियांमध्ये उत्साह.जनशताब्दी एक्स्प्रेसचेही डबे वाढवावेत.हॉलिडे एक्स्प्रेस नियमित करावी.थिरुवअनंतपूरम-निजामुद्दिन एक्स्प्रेससहीत १५ एक्स्प्रेस चिपळूण येथे थांबवाव्यात.चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग सुरु करावा.रत्नागिरी-पुणे, रत्नागिरी-वसईरोड दररोज, तर अजमेर-सतलाम मडगाव तीन दिवसाने, पनवेल-मडगाव बंगलोर दोन दिवसाने सुरु करावी.५ वर्षात ८ रेल्वेमंत्री झाले .परंतु, पत्रव्यवहार करणाऱ्या नागरिकांना न्याय नाही.