शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

‘राज्यराणी’चे डबे वाढल्याने कोकणवासीयांच्या अपेक्षा वाढल्या

By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST

कोकण रेल्वे : अनेक वर्षांच्या मागण्यांना मूर्त स्वरूप येणार?

सुभाष कदम - चिपळूण -जनशताब्दी व राज्यराणी एक्स्प्रेस या गाड्यांना डबे वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. पैकी दादर - सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेसला १४ऐवजी १७ डबे कायमस्वरुपी करण्याचा निर्णय झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने कोकणवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरेश प्रभू यांच्यासारखा अभ्यासू रेल्वेमंत्री कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळणार आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, नवीन गाड्या सुरु करण्याबाबत नागरिकांची मागणी आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे कोकणवासीयांसाठी शोभेची ठरली आहे. रेल्वेमुळे कोकणचा विकास किंवा पर्यटनवृद्धी झाली नाही. कोकणात येणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसचे डब्बे वाढविण्याची घोषणा २० महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. तिची अंमलबजावणी आता सुरु झाली आहे. आता जनशताब्दी एक्स्प्रेसला ५ जनरल कोच लावावे किंवा ३ सेमी असे १८ डबे जोडण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. यामुळे नाराजी आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, या हेतूने गणपती स्पेशल म्हणून १० दिवस रत्नागिरी-वसईरोड ही गाडी सुरु करण्यात आली होती. ही गाडी दररोज किंवा ३ दिवसांनी सुरु करावी, अशी मागणी आहे.रत्नागिरी ते वसईसाठी सकाळी ५ वाजता ती सुटेल, तर वसई रोडवरुन रत्नागिरीसाठी रात्री ९ वाजता निघेल. नव्याने सुरु होणाऱ्या थिरुअनंतरपूरम - निजामुद्दिन या नव्या एक्स्प्रेससह इतर १५ एक्स्प्रेसला चिपळूण येथे थांबा मिळावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. चिपळूण - कऱ्हाड हा अत्यंत महत्त्वाचा रेल्वेमार्ग सुरु झाल्यास कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल. शिवाय अनेक गाड्या कऱ्हाडमार्गे पुणेकडे जातील. या मार्गाचा विचार रेल्वे अर्थसंकल्पात झालेला नाही. परंतु, आता रेल्वेमंत्री प्रभू हे या मार्गाबाबत ठोस निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. कोकणासाठी मंत्री प्रभू हे झुकते माप देतील, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरी-पुणे रत्नागिरी वसईरोड दररोज, तर अजमेर - मडगाव, पनवेल बंगलोर या दोन दिवसांनी गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी आहे. आता या मागण्याही कधी पूर्ण होतात, याकडे कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.कोकण रेल्वेच्या विविध समस्यांबाबत गेले ५ वर्ष पत्रव्यवहार करुनही रेल्वे मंत्रालय दाद देत नाही. आतापर्यंत ५ वर्षात ममता बॅनर्जी, दिनेश त्रिवेदी, मुकूल रॉय, सी.पी.जोशी, पवनकुमार बन्सल, मल्लिकार्जुन खर्गे, डी.व्ही. सदानंद गौडा हे मंत्री होवून गेले तर आता सुरेश प्रभू आरुढ आहेत. ५ वर्षात ८ मंत्री या खात्याने पाहिले. परंतु, कोकणवासियांना यांनी न्याय दिला नाही. आता प्रभू मंत्री झाल्याने ते आपल्या भागाला न्याय देतील अशी अपेक्षा आहे.सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्याने कोकणवासियांमध्ये उत्साह.जनशताब्दी एक्स्प्रेसचेही डबे वाढवावेत.हॉलिडे एक्स्प्रेस नियमित करावी.थिरुवअनंतपूरम-निजामुद्दिन एक्स्प्रेससहीत १५ एक्स्प्रेस चिपळूण येथे थांबवाव्यात.चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग सुरु करावा.रत्नागिरी-पुणे, रत्नागिरी-वसईरोड दररोज, तर अजमेर-सतलाम मडगाव तीन दिवसाने, पनवेल-मडगाव बंगलोर दोन दिवसाने सुरु करावी.५ वर्षात ८ रेल्वेमंत्री झाले .परंतु, पत्रव्यवहार करणाऱ्या नागरिकांना न्याय नाही.