शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

पिण्याच्या पाण्याची चिंता वाढतेय

By admin | Updated: July 2, 2016 02:42 IST

तलाव क्षेत्रात अधूनमधून पाऊस डोकावत असल्याने गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस पडला आहे़

मुंबई : मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाने चाकरमान्यांना त्रास होत असला तरी तलाव क्षेत्रात अधूनमधून पाऊस डोकावत असल्याने गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस पडला आहे़ त्यामुळे आवश्यक जलसाठ्याच्या आठ टक्केच साठा तलावांमध्ये जमा झाला आहे़ मान्सून यंदा मुंबईत विलंबानेच दाखल झाला़ गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतलेली नाही़ सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईचे पाणी पाणी केले़, तरी तलाव क्षेत्र मात्र तहानलेलेच आहेत़ हा पाऊस गेल्या जून महिन्याच्या तुलनेत ५० टक्के कमीच आहे़ त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम एक लाख १० हजार दशलक्ष लीटर जलसाठा असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली़वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे़ गेल्या वर्षी अपुरा पाऊस पडला होता, तरीही जून महिन्यात तलावांमध्ये तीन लाख ३८ हजार २१७ दशलक्ष लीटर जलसाठा होता़ मात्र यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच तलावांमध्ये पाऊस फिरकलेला नाही़ त्यामुळे पाण्याचे टेन्शन वाढले आहे़ (प्रतिनिधी)मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून २० टक्के पाणीकपात सुरू असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़