शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठांविरोधी तक्रारी केल्याने वाढलेला जाच

By admin | Updated: May 4, 2015 01:47 IST

गेल्या दिड महिन्यांपासून बाबा खुप टेन्शनमध्ये होते. कामावरचा राग ते घरी काढत होते. कामावर वरिष्ठ निरिक्षक, एपीआयकडून होणाचा जाच ते आम्हाला सांगत होते

मुंबई : गेल्या दिड महिन्यांपासून बाबा खुप टेन्शनमध्ये होते. कामावरचा राग ते घरी काढत होते. कामावर वरिष्ठ निरिक्षक, एपीआयकडून होणाचा जाच ते आम्हाला सांगत होते. हा आमच्यासाठी नवा अनुभव होता. कारण याआधी त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया कधीच मिळाल्या नव्हत्या, अशा शब्दात सहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांचा मुलगा अभिषेकने आपल्या भावनांना वाट मोकळी केली. रविवारी दुपारी खेरवाडी स्मशानभुमीत शिर्र्केंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर घरी परतलेला अभिषेक बोलत होता. वाकोल्यातील कोले कल्याण पोलीस वसाहतीत राहाणाऱ्या शिर्र्कें पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. शिर्के मुळचे चिपुळणच्या कुटरे गावचे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत. दोन्ही मुली पदवीधर असून नोकरीच्या शोधात आहेत. मुलगा अभिषेक पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे शिर्र्केंच्या जाण्याने कुटुंबातला एकमेव कमावता हात नाहिसा झाला. त्यापेक्षा शिर्र्केंच्या अचानक जाण्याने त्यांचा परिवार सुन्न झाला. मी सहाय्यक फौजदर आहे. पण मला शिपायाची कामे दिली जातात. वयानुसार, आजारी पडल्यानंतर डॉक्टरने हलकी कामे द्यावीत, अशी सूचना केली होती. हे माहित असूनही हलकी कामे वाटयाला येत नव्हती, हे बाबा गेल्या दिड महिन्यांपासून सतत सांगत होते. त्याविरोधात त्यांनी उपायुक्तांकडे तक्रारही केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्यावरला जाच आणखी वाढला होता, अभिषेक सांगू लागला. दोन वर्षांपुर्वी ते सुमारे दोन महिने रूग्णालयात होते. त्या काळात बाबा खरोखर आजारी होते. मात्र ही सुटी का घेतली याचा खुलासा करा, असा मेमो नुकताच त्यांच्या हाती पडला होता, असा दावाही अभिषेकने केला.काल दुपारी ते एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभाला हजर होते. भेटलेल्या प्रत्येक नातेवाईकाशी त्यांनी हसत खेळत गप्पा केल्या. नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी त्यांनी आठच्या सुमारास घर सोडले. मात्र पुढल्या अर्ध्या तासात त्यांच्या हातून असे काही घडेल याची पुसटशी कल्पनाही त्यांच्या दिवसभरातल्या वागण्यातून आली नाही, असे अभिषेकने सांगितले.शिर्के यांच्या अंत्ययात्रेत त्यांच्या नातेवाईकांसह सहकारी पोलीस आणि मोठया संख्येने परिसरातील व्यावसायिक, फेरिवाले हजर होते. शिर्के शिघ्रकोपी असते, तापट असते तर त्यांच्या अंत्ययात्रेला इतकी गर्दी झाली असती का, असा सवाल नातेवाईकांनी केला. मुळात ते स्पष्टवक्ते होते. नियमांचे, कायद्याचे उल्लंघन त्यांना पटत नसे. त्यांचे हेच वागणे वरिष्ठ व अन्य सहकाऱ्यांना खुपत होते, अशाही प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या.