शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

वरिष्ठांविरोधी तक्रारी केल्याने वाढलेला जाच

By admin | Updated: May 4, 2015 01:47 IST

गेल्या दिड महिन्यांपासून बाबा खुप टेन्शनमध्ये होते. कामावरचा राग ते घरी काढत होते. कामावर वरिष्ठ निरिक्षक, एपीआयकडून होणाचा जाच ते आम्हाला सांगत होते

मुंबई : गेल्या दिड महिन्यांपासून बाबा खुप टेन्शनमध्ये होते. कामावरचा राग ते घरी काढत होते. कामावर वरिष्ठ निरिक्षक, एपीआयकडून होणाचा जाच ते आम्हाला सांगत होते. हा आमच्यासाठी नवा अनुभव होता. कारण याआधी त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया कधीच मिळाल्या नव्हत्या, अशा शब्दात सहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांचा मुलगा अभिषेकने आपल्या भावनांना वाट मोकळी केली. रविवारी दुपारी खेरवाडी स्मशानभुमीत शिर्र्केंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर घरी परतलेला अभिषेक बोलत होता. वाकोल्यातील कोले कल्याण पोलीस वसाहतीत राहाणाऱ्या शिर्र्कें पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. शिर्के मुळचे चिपुळणच्या कुटरे गावचे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत. दोन्ही मुली पदवीधर असून नोकरीच्या शोधात आहेत. मुलगा अभिषेक पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे शिर्र्केंच्या जाण्याने कुटुंबातला एकमेव कमावता हात नाहिसा झाला. त्यापेक्षा शिर्र्केंच्या अचानक जाण्याने त्यांचा परिवार सुन्न झाला. मी सहाय्यक फौजदर आहे. पण मला शिपायाची कामे दिली जातात. वयानुसार, आजारी पडल्यानंतर डॉक्टरने हलकी कामे द्यावीत, अशी सूचना केली होती. हे माहित असूनही हलकी कामे वाटयाला येत नव्हती, हे बाबा गेल्या दिड महिन्यांपासून सतत सांगत होते. त्याविरोधात त्यांनी उपायुक्तांकडे तक्रारही केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्यावरला जाच आणखी वाढला होता, अभिषेक सांगू लागला. दोन वर्षांपुर्वी ते सुमारे दोन महिने रूग्णालयात होते. त्या काळात बाबा खरोखर आजारी होते. मात्र ही सुटी का घेतली याचा खुलासा करा, असा मेमो नुकताच त्यांच्या हाती पडला होता, असा दावाही अभिषेकने केला.काल दुपारी ते एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभाला हजर होते. भेटलेल्या प्रत्येक नातेवाईकाशी त्यांनी हसत खेळत गप्पा केल्या. नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी त्यांनी आठच्या सुमारास घर सोडले. मात्र पुढल्या अर्ध्या तासात त्यांच्या हातून असे काही घडेल याची पुसटशी कल्पनाही त्यांच्या दिवसभरातल्या वागण्यातून आली नाही, असे अभिषेकने सांगितले.शिर्के यांच्या अंत्ययात्रेत त्यांच्या नातेवाईकांसह सहकारी पोलीस आणि मोठया संख्येने परिसरातील व्यावसायिक, फेरिवाले हजर होते. शिर्के शिघ्रकोपी असते, तापट असते तर त्यांच्या अंत्ययात्रेला इतकी गर्दी झाली असती का, असा सवाल नातेवाईकांनी केला. मुळात ते स्पष्टवक्ते होते. नियमांचे, कायद्याचे उल्लंघन त्यांना पटत नसे. त्यांचे हेच वागणे वरिष्ठ व अन्य सहकाऱ्यांना खुपत होते, अशाही प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या.