शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

रक्तक्षयामुळेही मातामृत्यूच्या प्रमाणात वाढ

By admin | Updated: July 5, 2016 01:04 IST

राज्यात मातामृत्यूमधील मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू हे रक्तक्षयाने (अ‍ॅनिमिया) होत असल्याचे राज्य शासनाच्या अहवालातून समोर आले आहे. मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता

पुणे : राज्यात मातामृत्यूमधील मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू हे रक्तक्षयाने (अ‍ॅनिमिया) होत असल्याचे राज्य शासनाच्या अहवालातून समोर आले आहे. मागील चार वर्षांची आकडेवारी पाहता गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षयाची समस्या जास्त असल्याचे दिसते. ग्रामीण किंवा दुर्गम भागात गर्भवती महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे या आकडेवारीतून समोर येत आहे. साधारणत: व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ते १४ असणे आवश्यक असते. त्यातही महिला गर्भवती असताना हे प्रमाण योग्य असणे अत्यावश्यक असते. मात्र महिलांमध्ये आजही आहाराबाबत पुरेशी जागरूकता नसल्याने हे प्रमाण कमी असल्याचे आढळते. अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी सहा किंवा सात असल्याचे दिसते. त्यामुळे १५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये रक्तक्षय मोठ्या प्रमाणात आढळते. राज्याच्या २०१२ ते २०१६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार मातामृत्यूचे प्रमाण जिल्हा आणि महापालिका स्तरावर जास्त आहे. (प्रतिनिधी)आरोग्य विभागाकडून योजना सुरूदीर्घकाळ शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल तर रक्तदाब कमी होणे, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारखी लक्षणे महिलांमध्ये दिसू लागतात. सात मिलीग्रॅमपेक्षा कमी हिमोग्लोबिन असणाऱ्या महिलांना रक्तक्षय आहे, असे समजले जाते.मातामृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य आरोग्य विभागाकडून नवसंजीवनी योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना यांसारख्या योजना राबविल्या जातात.- डॉ. दिगंबर कानगुले, प्रमुख-माता व बालविकास विभाग