शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वाढीव मदत

By admin | Updated: March 17, 2015 01:06 IST

सलग दुसऱ्या वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या शेतकऱ्यांना केंद्राच्या निकषानुसार लवकरच दुष्काळाची वाढीव मदत मिळणार आहे.

सुनील कच्छवे ल्ल औरंगाबाद सलग दुसऱ्या वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या शेतकऱ्यांना केंद्राच्या निकषानुसार लवकरच दुष्काळाची वाढीव मदत मिळणार आहे. राज्य सरकारकडून याआधी मोठ्या शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंतच दुष्काळी मदत देण्यात आली आहे. आता दुसऱ्यांदा संकटात सापडलेल्या मोठ्या शेतकऱ्यांना आणखी एका हेक्टरची मदत दिली जाईल. अशा शेतकऱ्यांच्या वेगळ्या याद्या तयार करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच देण्यात आले आहेत.मराठवाड्यातील सुमारे ३ लाख मोठ्या शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जानेवारी महिन्यात वैयक्तिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. दोन महिन्यांपासून या पॅकेजचे वाटप सुरू आहे. जिरायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी साडेचार हजार, बागायती क्षेत्रासाठी नऊ हजार रुपये आणि फळ पिकांखालील क्षेत्रासाठी बारा हजार रुपये याप्रमाणे ही मदत दिली जात आहे. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व क्षेत्रासाठी, तर मोठ्या शेतकऱ्यांना केवळ एक हेक्टरपर्यंतच ही मदत जाहीर झालेली आहे. मात्र; गतवर्षी गारपिटीचा फटका बसला होता़ फेबु्रवारी २०१४मध्ये १४ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. च्राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना सलग दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागला असेल तर मोठ्या शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंतची मदत देण्यात यावी, असा निकष आहे. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष करून मराठवाड्यातील मोठ्या शेतकऱ्यांना एक हेक्टरपर्यंतच मदत दिली जात आहे. ‘लोकमत’ने ९ मार्च रोजीच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर राज्य सरकारने निकषांनुसार वाढीव मदत देण्याचे ठरविले आहे. च्यंदा मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने विभागातील जवळपास सर्व ४३ लाख शेतकऱ्यांना मदत देऊ केली आहे. गतवर्षी १० लाख हेक्टरवरचे नुकसान झाले होते. तेव्हा विभागातील १४ लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक मदत देण्यात आली होती. आता दोन्ही वर्षी नुकसान झालेल्या १४ लाख शेतकऱ्यांपैकी मोठ्या शेतकऱ्यांना वेगळे काढून त्यांना वाढीव मदत दिली जाणार आहे.याद्या तयार करण्याचे आदेशविभागात सलग दुसऱ्या वर्षी नुकसान झालेल्या मोठ्या शेतकऱ्यांच्या वेगळ्या याद्या तयार करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत दुष्काळी मदत मिळणे अपेक्षित आहे. उर्वरित एका हेक्टरच्या मदतीसाठी याद्या तयार केल्या जात असल्याचे विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गारपिटीमुळे द्राक्ष, डाळींब, कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा बियाण्यांच्या झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. सोमवारी शेतकऱ्यांनी चांदवड आणि दिंडोरी येथे रास्तारोको केला. चांदवड तालुका काँग्रेसतर्फे मुंबई - आग्रा महामार्गावर पेट्रोलपंप चौफुलीजवळ माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली तर दिंंडोरीत माजी आमदार धनराज महाले, नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला. आंदोलकांनी रस्त्यावर द्राक्ष ओतून व वीज बिलाची होळी केली.