शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

अल्पवयीन वाहनचालकांमुळे वाढले अपघात

By admin | Updated: December 24, 2015 00:42 IST

पुणे-नाशिक रस्त्यावर नुकत्याच झालेल्या अपघातात अनुक्रमे १५ व १६ वर्षांचे युवक गंभीर जखमी झाले. वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभवही नसणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींच्या हाती दुचाकी देणे

भोसरी : पुणे-नाशिक रस्त्यावर नुकत्याच झालेल्या अपघातात अनुक्रमे १५ व १६ वर्षांचे युवक गंभीर जखमी झाले. वाहन चालवण्याचा परवाना आणि अनुभवही नसणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींच्या हाती दुचाकी देणे किती धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट झाले आहे. परवाना असल्याशिवाय वाहन चालवण्यास पालकांनी मुलांना परवानगीच देऊ नये. तसेच पोलीस प्रशासनाने अल्पवयीन मुलांच्या धूम स्टाईलवर कारवाई करण्याची गरज आहे. मुलांचे हट्ट व त्याला पालकांची मूकसंमती यामुळेच अशा गंभीर समस्या उद्भवत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्याच्या काळात घरोघरी दुचाकी वाहने असतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीतून वाट काढताना जिथे प्रशिक्षित, अनुभवी चालकांना कसरत करावी लागत आहे, तिथे वाहन चालवण्याचा अनुभव नसणारे वाहनचालक म्हणजे अपघातास निमंत्रण असते. परंतु अल्प, तसेच किशोरवयीन मुले मात्र रहदारीच्या रस्त्यामधून दुचाकी सुसाट हाकत जात असतात. तसेच अनेक जण स्टंटबाजी करतानाही दिसून येतात. तरुणांची वाहन चालविण्याची पद्धत पाहिल्यावर अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. पोलीस प्रशासनाचे नियंत्रण आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांना योग्य ते प्रशिक्षण दिले गेलेले नसते. त्यात रस्त्यावर दुचाकी चालविण्याचा कमी अनुभव, पण मुलांच्या हट्टामुळे पालकवर्ग दुर्लक्ष करतात. त्यामुळे परवाना नसतानाही ते रस्त्याने वाहने चालवताना दिसून येतात. शनिवार, रविवार व सुटीच्या काळात अल्पवयीन मुले हमखास मोठ्या संख्येने दुचाकी चालवताना आढळतात. या सर्व बाबींकडे गांभीर्याने बघणे हे जितके पालकवर्गाचे कर्तव्य आहे, तितकेच पोलीस प्रशासनाचे देखील आहे. शाळा, कॉलेज परिसरात मुख्य रस्त्यांवर यासाठी पोलिसांकडून काही कारवाई होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागला आहे. (वार्ताहर)वाहन चालविण्याचा हट्ट लहान मुले अनेक वेळा करतात आणि पालकही अशा हट्टाला बळी पडतात. ज्या वयात पूर्वी सायकल चालवायला मुले घाबरत असत, त्या वयाची मुले सुसाट वेगाने दुचाकी पळवताना, कट मारताना पाहवयास मिळत आहेत. अनेक वेळा सात-आठ वर्षांच्या मुलांना कौतुकाने पालकवर्ग दुचाकीचा हँडल पकडायला देतात. पुढे काय होईल, याचा विचार पालकवर्गच करीत नाही.अशा प्रकारे दुचाकी चालविणे जीवावर किती बेतू शकेल, याचा तिळमात्र विचार पालकवर्ग करीत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे भौतिक सोयी-सुविधांची वाढलेली ओढ अशा वागण्यास कारणीभूत ठरत आहे. हीच तरुणाई वाहन चालविताना मात्र हॉर्नचा वापर अतिशय कमी प्रमाणात करताना आढळते. दुचाकीच्या दोन्ही साइडचे आरसे म्हणजे यांना जणूकाही अडचणच वाटते. यावर वेळीच उपाययोजना हवी.