शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पटसंख्या वाढवा!

By admin | Updated: April 8, 2016 01:02 IST

गुणवत्तेचे व भौतिक सुविधांचे कारण देत दर वर्षी जिल्हा परिषद शाळांतून कमी होणारी विद्यार्थिसंख्या या वर्षी पूर्णपणे रोखून ती वाढविण्यात येणार असून, यासाठी ‘आला पाडवा-पटसंख्या वाढवा’ असा कार्यक्रम हाती

पुणे : गुणवत्तेचे व भौतिक सुविधांचे कारण देत दर वर्षी जिल्हा परिषद शाळांतून कमी होणारी विद्यार्थिसंख्या या वर्षी पूर्णपणे रोखून ती वाढविण्यात येणार असून, यासाठी ‘आला पाडवा-पटसंख्या वाढवा’ असा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.८ ते १५ एप्रिल दरम्यान पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सन २0१२-१३ मध्ये २ लाख ४६ हजार ७६५ इतकी पटसंख्या होती. ती २0१३-१४ मध्ये २ लाख ३९ हजार ५३0 इतकी झाली. म्हणजे या वर्षात ७ हजार २३५ इतकी पटसंख्या कमी झाली. सन २0१४-१५ मध्ये २ लाख ३४ हजार ५६0 इतकी झाली. या वर्षात ४ हजार ९७0 इतकी पटसंख्या घटली. सन २0१५-१६ मध्ये २ लाख ३४ हजार २७0 इतकी म्हणजे या वर्षात फक्त २९0 पटसंख्या घटली. यावरून १0१३-१४ मध्ये ७ हजार २३५ इतके प्रमाण २0१५-१६ मध्ये २९0 पर्यंत कमी करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची मासिक आढावा बैैठक झाली. यात गुणवत्ता वाढीवर चर्चा करून पुढील वर्र्षात घटीचे प्रमाण शून्य करून पटसंख्यावाढ करण्याचा या वर्षी संकल्प केला आहे. सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना ‘आला पाडवा पटसंख्या वाढवा’ असे आवाहन केले असल्याचे वांजळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)> जल्हा परिषदेची एकही शाळा ‘क’ आणि ‘ड या प्रवर्गात राहणार नाही. सर्व शाळा या ‘अ’ व ‘ब’ वर्गातच असतील. हेचे पुढील काळात आमचे उद्दिष्ट राहणार असून, पालकांनी जिल्हा परिषद शाळेतच आपल्या पाल्यांना दाखल करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. मातृभाषेतच मुलांना चांगले शिक्षण मिळते यावर आमचा विश्वास आहे. पटसंख्या नक्कीच वाढलेली असेल. > जिल्हा परिषद शाळाही गुणवत्तेत कुठे कमी नाहीत, हे पालकांना पटवून देता आले पाहिजे. यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी गुणवत्तावाढीसाठी आम्ही हे करीत आहोत, असा ठाम कार्यक्रम घेऊन त्याची जाहिरात करावी.- कुलदीप कोंडे,जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना