शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

विदर्भात तापमानामध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 02:28 IST

राज्यात दुसऱ्यांदा पावसाचा खंड पडला असून, खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विदर्भात पावसाचा खंड तर पडलाच, शिवाय तापमानातही वाढ झाल्याने पिके

अकोला : राज्यात दुसऱ्यांदा पावसाचा खंड पडला असून, खरीप हंगामातील पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विदर्भात पावसाचा खंड तर पडलाच, शिवाय तापमानातही वाढ झाल्याने पिके कोमेजू लागली आहेत. या आठवड्यात पाऊस न आल्यास फळधारणेवर आलेली पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.राज्यात ९३ टक्के क्षेत्रावर, म्हणजेच १ कोटी १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली; पण जून महिन्याच्या पावसानंतर दीड महिना दडी मारल्याने पिकांना अगोदरच फटका बसला होता. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस पाऊस आला, त्यानंतर पुन्हा २० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने दुष्काळाचे सावट कायम आहे. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाचे स्वरू प सार्वत्रिक नव्हते. त्यानंतर तापमानात वाढ झाली असून, या तापमानाने पुन्हा जमीन भेगाळली आहे.मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील स्थितीही गंभीर आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात आतापर्यंत ५०८. ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीच्या ४ टक्के कमी असला तरी हा पाऊस केवळ चार दिवस पडला.राज्यात पुन्हा पावसाने दडी मारली असून, पिकांना त्याची झळ बसताना दिसत आहे. राज्यात ९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. आता केवळ पावसाची प्रतीक्षा आहे. अनिल बनसोड, कृषी सांख्यिकी अधिकारी, कृषी आयुक्तालय, पुणे.