शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तलावांची साठवणक्षमता वाढवा

By admin | Updated: May 17, 2016 01:57 IST

दौंडच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.

दौंड : भविष्यात पाण्याची समस्या कठीण होत जाणार आहे. तेव्हा दौंडच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल. तलावांच्या खोलीकरणाची गरज असून चित्रीकरण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनीि अधिकाऱ्यांना दिल्या.खडकवासला धरणातून दौंडसाठी पाणी सोडल्यानंतर पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाजवळ पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी आले असता ते बोलत होते. माटोबा तलाव, वरवड येथील व्हिक्टोरिया तलावावर जावून पाणी किती आले हे पाहिले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राहुल कुल, शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, दौंडचे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे वासुदेव काळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, तानाजी दिवेकर, विकास जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, तहसीलदार उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संतोष हराळे उपस्थित होते. (वार्ताहर)>एमआयडीसीचे पाणी बंद करावायनरीचे व एमआयडीसीचे पाणी बंद करावे, अशी मागणी वासुदेव काळे व तानाजी दिवेकर यांनी केली. नाहीतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहणार नाही. माटोबा तलावाचे खोलीकरण गरजेचे माटोबा तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी तलावाची उंची वाढविण्याची मागणी तेथील काही पदधिकाऱ्यांनी केली. राहुल कुल यांनी उंची वाढविण्याऐवजी खोलीकरण केल्यास कोणाच्याही जमिनी अधिग्रहण न करता जास्तीचे पाणी साठवता येईल, अशी भूमिका मांडली. यावर बापट यांनीदेखील खोलीकरण करणे सोयीस्कर राहील, संबंधित अधिकाऱ्यांनी तलावाचे चित्रीकरण करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.ड्रेनेजचे पाणी शेतीला द्यादिवसेंदिवस दौंडची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे काळाची गरज आहे. शहरातील ड्रेनेजचे पाणी शेतीला दिले, तर निश्चितच त्याचा उपयोग शेतीसाठी होईल, याचाही दौंड नगर परिषदेने विचार करणे गरजेचे आहे. दौंडच्या पाण्याचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा. तो सोडविण्यासाठी योग्य ते कामकाज केले जाईल, असे शेवटी बापट म्हणाले. पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नाथाचीवाडी परिसरात तलावातील पाणी देण्याचे आदेश देऊनदेखील अधिकारीवर्ग पाणी देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार उपस्थित शेतकऱ्यांनी केल्यानंतर आमदार राहुल कुल यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून टाळाटाळ करीत असल्याबद्दल चांगलेच फैलावर घेतले.