शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

तलावांची साठवणक्षमता वाढवा

By admin | Updated: May 17, 2016 01:57 IST

दौंडच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल.

दौंड : भविष्यात पाण्याची समस्या कठीण होत जाणार आहे. तेव्हा दौंडच्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी योग्य नियोजन करावे लागेल. तलावांच्या खोलीकरणाची गरज असून चित्रीकरण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनीि अधिकाऱ्यांना दिल्या.खडकवासला धरणातून दौंडसाठी पाणी सोडल्यानंतर पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाजवळ पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी आले असता ते बोलत होते. माटोबा तलाव, वरवड येथील व्हिक्टोरिया तलावावर जावून पाणी किती आले हे पाहिले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राहुल कुल, शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, दौंडचे ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे, भाजपा किसान मोर्चाचे वासुदेव काळे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, तानाजी दिवेकर, विकास जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, तहसीलदार उत्तम दिघे, गटविकास अधिकारी संतोष हराळे उपस्थित होते. (वार्ताहर)>एमआयडीसीचे पाणी बंद करावायनरीचे व एमआयडीसीचे पाणी बंद करावे, अशी मागणी वासुदेव काळे व तानाजी दिवेकर यांनी केली. नाहीतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहणार नाही. माटोबा तलावाचे खोलीकरण गरजेचे माटोबा तलावाच्या साठवण क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी तलावाची उंची वाढविण्याची मागणी तेथील काही पदधिकाऱ्यांनी केली. राहुल कुल यांनी उंची वाढविण्याऐवजी खोलीकरण केल्यास कोणाच्याही जमिनी अधिग्रहण न करता जास्तीचे पाणी साठवता येईल, अशी भूमिका मांडली. यावर बापट यांनीदेखील खोलीकरण करणे सोयीस्कर राहील, संबंधित अधिकाऱ्यांनी तलावाचे चित्रीकरण करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना दिल्या.ड्रेनेजचे पाणी शेतीला द्यादिवसेंदिवस दौंडची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन करणे काळाची गरज आहे. शहरातील ड्रेनेजचे पाणी शेतीला दिले, तर निश्चितच त्याचा उपयोग शेतीसाठी होईल, याचाही दौंड नगर परिषदेने विचार करणे गरजेचे आहे. दौंडच्या पाण्याचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा. तो सोडविण्यासाठी योग्य ते कामकाज केले जाईल, असे शेवटी बापट म्हणाले. पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नाथाचीवाडी परिसरात तलावातील पाणी देण्याचे आदेश देऊनदेखील अधिकारीवर्ग पाणी देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार उपस्थित शेतकऱ्यांनी केल्यानंतर आमदार राहुल कुल यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून टाळाटाळ करीत असल्याबद्दल चांगलेच फैलावर घेतले.