शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अधिका-यांच्या बढत्या अडल्या: सेवा प्रवेश नियमांचा झाला ‘पुराभिलेख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 02:56 IST

सन १६३० पासूनचे राज्याचे रेकॉर्ड सांभाळणाºया राज्य पुराभिलेख संचालनालयातील बहुतेक सर्व अधिकाºयांची पदोन्नती ही सेवा प्रवेश नियमांअभावी अडली आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : सन १६३० पासूनचे राज्याचे रेकॉर्ड सांभाळणाºया राज्य पुराभिलेख संचालनालयातील बहुतेक सर्व अधिकाºयांची पदोन्नती ही सेवा प्रवेश नियमांअभावी अडली आहे. या नियमांचा गेल्या पाच वर्षांत फुटबॉल झाला असून त्यात अधिकाºयांच्या भवितव्याचा खेळखंडोबा सुरु आहे. पुराभिलेख विभागाचे सेवानियमच पुराभिलेख होतात की काय अशी अवस्था आहे.राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालय येते. या संचालनलयाच्या सेवा प्रवेश नियमांना राज्यपालांनी २०१२ मध्ये मंजुरी दिलेली होती. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या सहा वर्षांत त्यांची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. या सेवा प्रवेश नियमांत काही सुधारणा करायच्या आहेत, असे कारण देऊन ते सुरुवातीला थांबविण्यात आले. राज्यपालांनी मंजुरी दिलेले सेवाप्रवेश नियम हे शासकीय मुद्रणालयात छपाईलाही गेले पण तेथून ते परत मागविण्यात आल्यानंतर त्याचा रखडण्याचा प्रवास सुरू झाला आणि तो आजही थांबलेला नाही.सुधारित नियमांचा प्रवास मग पुराभिलेख कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभाग असा सुरू राहिला. दरवेळी कुठल्या ना कुठल्या उणिवांवर बोट ठेऊन सामान्य प्रशासन विभाग या नियमांबाबत विचारणा करीत राहते आणि पुराभिलेख विभागातील एक अधिकारी सहा-सहा महिने त्याचे उत्तरच देत नाहीत, अशी धक्कादायक माहिती आहे. आस्थापनेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे झारीतील शुक्राचार्य त्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पदोन्नतीची साखळीच थांबली असून गेली पाच-सहा वर्षे अधिकारी पदोन्नतीपासून वंचित आहेत.राज्यपालांनी मंजुरी दिलेले सेवानियम जसेच्या तसे मंजूर करावेत आणि नंतर त्यात काही सुधारणा करायची असल्यास ती करता येईल, असा मध्यममार्ग स्वीकारल्यास पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी या विभागातील अधिकाºयांची भावना आहे.अतिरिक्त कार्यभार-सध्या हा विभाग पूर्णत: प्रतिनियुक्तीवर किंवा विभागातील अधिकाºयांना अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांच्या भरवश्यावर चालविला जात आहे.संचालक, सहाय्यक संचालक, उपसंचालक, अधीक्षक, लेखापाल या पदांचा त्यात समावेश आहे.