शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय प्रवेशासाठीच्या ऑनलाईन नोंदणीत वाढ

By admin | Updated: July 11, 2016 19:47 IST

यंदा आयटीआय प्रवेशासाठी विभागातील एकूण जागांच्या तुलनेत तब्बल साडेतीन पट जास्तीची आॅनलाईन नोंदणी झाली.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 11-  यंदा आयटीआय प्रवेशासाठी विभागातील एकूण जागांच्या तुलनेत तब्बल साडेतीन पट जास्तीची आॅनलाईन नोंदणी झाली. आज सोमवारी आॅनलाईन नोंदणीची शेवटची मुदत होती. मराठवाड्यातील ८२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १९ हजार जागांसाठी ७० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उद्या अंतीम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर १४ जुलैपासून प्रत्यक्ष प्रवेश फेरीला सुरूवात होईल.

शून्य गुणासंबंधीचा निकाल

आयटीआयच्या तिसऱ्या सत्राच्या पेपरमध्ये जवळपास ३०० पेक्षा जास्त मुलांना शून्य गुण मिळाले आहेत. ही चूक संगणकीय नोंदीमुळे झाली असून दोन- तीन दिवसांत यासंबंधीचा निकाल अपेक्षित असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. तथापि, चांगला पेपर लिहिल्यानंतरही शून्य गुण मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सहसंचालकांना निवेदन सादर केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्राच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये शून्य गुण मिळाले आहेत. यासंदर्भात मे महिन्यांपासून संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. रविंद्र बाळापूरे यांची भेट घेऊन यासंबंधीचा जाब विचारला. त्यावेळी ५ ते ७ दिवसांत चुकीची दुरुस्ती होईल, असे सांगितले होते. दोन महिन्यांचा कालावधी लोटला; पण अद्यापही शून्य गुणांचा तिढा कायम आहे. आज सोमवारी भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन झवेरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सहसंचालक डॉ. बाळापुरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. शेवटी प्राचार्य इंदिरेश भिलेगावकर यांनी भाजयुमोच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. आयटीआयह्णच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याची जबाबदारी दिल्ली येथील एका संगणकीय संस्थेकडे देण्यात आली आहे. सदरील विद्यार्थ्यांचे केवळ इंटरनल मार्क्स त्या संस्थेकडे पोहोचले असावेत. त्यांना लेखी परीक्षेचे मार्क्स मिळाले नसतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शून्य गुण दिले असावेत, अशी माहिती त्यांना देण्यात आली. दरम्यान, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन झवेरी, राहुल नरोटे, मयूर वंजारी, महेश राऊत, संकेत प्रधान, युवराज सिद्ध यांच्या शिष्टमंडळाला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या निरीक्षकांनी लेखी कळविले की, येत्या दोन-तीन दिवसांत विद्यार्थ्यांना मिळालेल्या शून्य गुणांची दुरुस्ती होईल. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे कळविली जातील.