शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

आयटीआय प्रवेशासाठीच्या ऑनलाईन नोंदणीत वाढ

By admin | Updated: July 11, 2016 19:47 IST

यंदा आयटीआय प्रवेशासाठी विभागातील एकूण जागांच्या तुलनेत तब्बल साडेतीन पट जास्तीची आॅनलाईन नोंदणी झाली.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 11-  यंदा आयटीआय प्रवेशासाठी विभागातील एकूण जागांच्या तुलनेत तब्बल साडेतीन पट जास्तीची आॅनलाईन नोंदणी झाली. आज सोमवारी आॅनलाईन नोंदणीची शेवटची मुदत होती. मराठवाड्यातील ८२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १९ हजार जागांसाठी ७० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उद्या अंतीम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर १४ जुलैपासून प्रत्यक्ष प्रवेश फेरीला सुरूवात होईल.

शून्य गुणासंबंधीचा निकाल

आयटीआयच्या तिसऱ्या सत्राच्या पेपरमध्ये जवळपास ३०० पेक्षा जास्त मुलांना शून्य गुण मिळाले आहेत. ही चूक संगणकीय नोंदीमुळे झाली असून दोन- तीन दिवसांत यासंबंधीचा निकाल अपेक्षित असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. तथापि, चांगला पेपर लिहिल्यानंतरही शून्य गुण मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सहसंचालकांना निवेदन सादर केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्राच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये शून्य गुण मिळाले आहेत. यासंदर्भात मे महिन्यांपासून संबंधित विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. रविंद्र बाळापूरे यांची भेट घेऊन यासंबंधीचा जाब विचारला. त्यावेळी ५ ते ७ दिवसांत चुकीची दुरुस्ती होईल, असे सांगितले होते. दोन महिन्यांचा कालावधी लोटला; पण अद्यापही शून्य गुणांचा तिढा कायम आहे. आज सोमवारी भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन झवेरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सहसंचालक डॉ. बाळापुरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. शेवटी प्राचार्य इंदिरेश भिलेगावकर यांनी भाजयुमोच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. आयटीआयह्णच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याची जबाबदारी दिल्ली येथील एका संगणकीय संस्थेकडे देण्यात आली आहे. सदरील विद्यार्थ्यांचे केवळ इंटरनल मार्क्स त्या संस्थेकडे पोहोचले असावेत. त्यांना लेखी परीक्षेचे मार्क्स मिळाले नसतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शून्य गुण दिले असावेत, अशी माहिती त्यांना देण्यात आली. दरम्यान, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष सचिन झवेरी, राहुल नरोटे, मयूर वंजारी, महेश राऊत, संकेत प्रधान, युवराज सिद्ध यांच्या शिष्टमंडळाला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या निरीक्षकांनी लेखी कळविले की, येत्या दोन-तीन दिवसांत विद्यार्थ्यांना मिळालेल्या शून्य गुणांची दुरुस्ती होईल. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे कळविली जातील.