शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवाव्यात’

By admin | Updated: May 19, 2016 05:09 IST

राज्यात रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून दरवर्षी साडेचार हजार नवीन डॉक्टर बाहेर पडतात.

मुंबई : राज्यात रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून दरवर्षी साडेचार हजार नवीन डॉक्टर बाहेर पडतात. पण त्या वेळी पदव्युत्तर (एमडी, एमएस) शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या १ हजार ६०० इतकीच आहे. राज्य सरकारने मनावर घेतल्यास पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढू शकतात. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) पत्र लिहिले आहे.८ आॅगस्ट २०१५ रोजी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागेसाठी ‘एमसीआय’ने मान्यता दिली असेल, तर ते महाविद्यालय केंद्र सरकारच्या परवानगीने जागा वाढवू शकते. त्या निकालानुसार राज्यातील शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवणे सहज शक्य आहे. या जागा वाढल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार असल्याचे मत सेंट्रल मार्डचे उपाध्यक्ष डॉ. अमित लोमटे यांनी व्यक्त केले. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, तर त्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. पण, सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवल्यास सहज जागा वाढवणे शक्य आहे. कारण, जागा वाढवण्यासाठी ‘एमसीआय’च्या पुन्हा पाहणीची आवश्यकता नसते, असे मार्डने पत्रात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)