शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विवाहित पुरुषांच्या आत्महत्येत वाढ

By admin | Updated: May 18, 2017 02:35 IST

पतीच्या जाचाला पत्नी बळी पडत असल्याच्या घटना वरचेवर ऐकायला मिळतात. परंतु आता पत्नीचा जाच पतीला सहन करत लागत असल्याचा दावा पुरुष हक्क संघटनेकडून

- स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पतीच्या जाचाला पत्नी बळी पडत असल्याच्या घटना वरचेवर ऐकायला मिळतात. परंतु आता पत्नीचा जाच पतीला सहन करत लागत असल्याचा दावा पुरुष हक्क संघटनेकडून होत आहे. देशभरात २१ वर्षांत तब्बल १० लाख ३३ हजार ९७६ विवाहित पुरुषांनी पत्नीकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून जीवन संपविले आहे.पुण्यात मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार, २०१५ मध्ये देशभरात तब्बल ६४ हजार ५३४ विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर २०१३, २०१४ साली अनुक्रमे ६४ हजार ०९८ आणि ५९ हजार ७४४ विवाहित पुरुषांनी आयुष्य संपविले. पत्नीच्या जाचामुळे पतीने आत्महत्या करण्याच्या घटना वाढत आहेत.२१ वर्षातील ही आकडेवारी पाहता त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वर्ष आत्महत्या१९९५ ३५,२४५२000 ४६,000२00५ ५२,४८३२0१0 ६१,४५३२0११ ६२,४00२0१२ ६३,३४३२0१३ ६४,0९८२0१४ ५९,७४४२0१५ ६४,५३४निराशेवर समुपदेशातून मात करणे शक्य मुली जशा आईवडिलांचे घर सोडून येतात तसेच मुलानेही लग्नानंतर आईवडिलांचे घर सोडून स्वतंत्र संसार थाटावा, अशी आजकाल अनेक मुलींची अपेक्षा असते. पतीकडून त्यांच्या कौटुंबिक, आर्थिक पातळीवर अनेक अपेक्षा असतात. अपेक्षापूर्ती न झाल्यास वाद होतात. अनेक निराश पती समुपदेशनाससाठी येतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना आलेले नैराश्य, कौटुंबिक कलह, पत्नीच्या एकाधिकारशाहीमुळे आलेला तणाव याची जाणीव होते. समुपदेशनामुळे त्यावर मात करणे शक्य होते.- डॉ. राजेंद्र बर्वे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ