शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोधैर्य’ नुकसानभरपाईत वाढ?

By admin | Updated: February 23, 2017 04:52 IST

लैंगिक अत्याचार झालेल्या व अन्य अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या

मुंबई : लैंगिक अत्याचार झालेल्या व अन्य अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईमध्ये तीन लाख रुपयांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा विचार करू, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले.मनोधैर्य योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला व अन्य अत्याचार झालेल्या पीडित महिलेला तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्याव्यतिरिक्त राज्य सरकार त्यांच्यासाठी समुपदेशनाची सुविधाही पुरवते. तसेच त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे किंवा शिक्षण देण्यासाठीही सरकार पुढाकार घेते. मात्र सर्वांसाठी नुकसानभरपाईची एकच रक्कम निश्चित करण्यात आली आहे. एकच रक्कम निश्चित न करता प्रत्येक केसनुसार नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात यावी, असे मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. लैंगिक अत्याचार झालेल्या १४ वर्षीय मुलीने सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत तीन लाख  रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकार पीडितांना केवळ तीन लाख रुपये नुकसानभरपाई देते. परंतु, गोवा सरकार अशा पीडितांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देते, असे मुलीच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. यावर आपण विचार करू, असे मुख्य न्या. चेल्लुर यांनी म्हटले. पीडिता बोरीवलीची रहिवासी असून एका माणसाने तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने स्वत:हूनच शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिली होती, त्यामुळे ही केस लैंगिक अत्याचाराची नाही, असे म्हणत राज्य सरकारने तिला नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. ‘यामध्ये मुलीची सहमती होती, ही राज्य सरकारची भूमिका पाहून मला धक्का बसला आहे. ती (पीडिता) केवळ १४ वर्षांची आहे. सहमती देण्याइतपत तिला समज आहे किंवा तिला याबाबतीत ‘सहमती’चा अर्थ कळतो, असे तुम्हाला वाटते का? जरी तिने संमती दिली असली तरी कायद्याने तो लैंगिक अत्याचारच ठरतो,’ असे म्हणत खंडपीठाने पुढील सुनावणीत मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) खरेच सहमती होती?पीडिता केवळ १४ वर्षांची आहे. सहमती देण्याइतपत तिला समज आहे किंवा तिला याबाबतीत ‘सहमती’चा अर्थ कळतो, असे तुम्हाला वाटते का? जरी तिने संमती दिली असली, तरी कायद्याने तो लैंगिक अत्याचारच ठरतो, मुलीची सहमती होती, ही राज्य सरकारची भूमिका पाहून आम्हाला धक्का बसला आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.