शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

‘मनोधैर्य’ नुकसानभरपाईत वाढ?

By admin | Updated: February 23, 2017 04:52 IST

लैंगिक अत्याचार झालेल्या व अन्य अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या

मुंबई : लैंगिक अत्याचार झालेल्या व अन्य अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईमध्ये तीन लाख रुपयांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा विचार करू, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले.मनोधैर्य योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला व अन्य अत्याचार झालेल्या पीडित महिलेला तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. त्याव्यतिरिक्त राज्य सरकार त्यांच्यासाठी समुपदेशनाची सुविधाही पुरवते. तसेच त्यांच्यातील कलाकौशल्य विकसित व्हावे किंवा शिक्षण देण्यासाठीही सरकार पुढाकार घेते. मात्र सर्वांसाठी नुकसानभरपाईची एकच रक्कम निश्चित करण्यात आली आहे. एकच रक्कम निश्चित न करता प्रत्येक केसनुसार नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात यावी, असे मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. लैंगिक अत्याचार झालेल्या १४ वर्षीय मुलीने सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत तीन लाख  रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकार पीडितांना केवळ तीन लाख रुपये नुकसानभरपाई देते. परंतु, गोवा सरकार अशा पीडितांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देते, असे मुलीच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. यावर आपण विचार करू, असे मुख्य न्या. चेल्लुर यांनी म्हटले. पीडिता बोरीवलीची रहिवासी असून एका माणसाने तिला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने स्वत:हूनच शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिली होती, त्यामुळे ही केस लैंगिक अत्याचाराची नाही, असे म्हणत राज्य सरकारने तिला नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. ‘यामध्ये मुलीची सहमती होती, ही राज्य सरकारची भूमिका पाहून मला धक्का बसला आहे. ती (पीडिता) केवळ १४ वर्षांची आहे. सहमती देण्याइतपत तिला समज आहे किंवा तिला याबाबतीत ‘सहमती’चा अर्थ कळतो, असे तुम्हाला वाटते का? जरी तिने संमती दिली असली तरी कायद्याने तो लैंगिक अत्याचारच ठरतो,’ असे म्हणत खंडपीठाने पुढील सुनावणीत मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) खरेच सहमती होती?पीडिता केवळ १४ वर्षांची आहे. सहमती देण्याइतपत तिला समज आहे किंवा तिला याबाबतीत ‘सहमती’चा अर्थ कळतो, असे तुम्हाला वाटते का? जरी तिने संमती दिली असली, तरी कायद्याने तो लैंगिक अत्याचारच ठरतो, मुलीची सहमती होती, ही राज्य सरकारची भूमिका पाहून आम्हाला धक्का बसला आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.