शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ

By admin | Updated: March 18, 2016 04:05 IST

महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारचा दावा काहीही असला तरी राज्यातील महिला आजही असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात महिलांवरील

मुंबई : महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारचा दावा काहीही असला तरी राज्यातील महिला आजही असुरक्षित असल्याचे वास्तव आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांचे अपहरण करणे वा त्यांना पळवून नेण्याच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ झाली आहे. विधानसभेत आज सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात सामाजिक क्षेत्रावर प्रकाश टाकताना ही माहिती देण्यात आली आहे. २०१३ मध्ये महिलांवरील बलात्काराच्या ३०६३ घटना घडल्या होत्या. २०१४ मध्ये ही संख्या ३४३८ वर गेली. २०१५ अखेर हा आकडा ४१७६ वर गेला आहे. अपहरणाच्या घटना पहिल्या दोन वर्षांत अनुक्रमे १८७४, २४५७ अशी होती. २०१५ मध्ये अपहरणाच्या ४८६४ घटना घडल्या. महिलांच्या विनयभंगाच्या ११६९६ घटना गेल्या वर्षी घडल्या. २०१३ मध्ये ही संख्या ८१३२ तर त्यानंतरच्या वर्षी १०००१ इतकी होती. लैंगिक अत्याचाराच्या घटना मात्र कमी झाल्या. त्यांची संख्या तीन वर्षांत अनुक्रमे २६३२, १५७५ आणि ९८६ अशी होती. (विशेष प्रतिनिधी)बालक अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ- बालकांचे अपहरण वा त्यांना पळवून नेण्याच्या घटना २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये तिपटीने वाढल्या. - २०१४ मध्ये २६१६ बालकांचे अपहरण झाले होते. २०१५ मध्ये ६५७६ बालकांचे अपहरण झाले. - बालकांच्या खुनाचे प्रमाण मात्र घटले. २०१४ मध्ये २०७ तर नंतरच्या वर्षी १४३ खून झाले.