शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

कळंब येथे रुग्णांची गैरसोय

By admin | Updated: May 21, 2016 03:14 IST

वैद्यकीय अधिकारी दोन महिन्यांच्या रजेवर असल्याने व त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आलेले प्रभारी अधिकारी देखील रजेवर असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे

नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब येथील आदिवासीबहुल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी दोन महिन्यांच्या रजेवर असल्याने व त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आलेले प्रभारी अधिकारी देखील रजेवर असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. गेले अनेक दिवस हे रुग्णालय डॉक्टरांविनाच सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत असून जादा पैसे खर्च करावे लागत आहेत.नेरळ- कळंब रस्त्यालगत कळंब गावाजवळ हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. कळंब परिसरातील अनेक ग्रामीण भागातील आदिवासी रुग्ण कमी खर्चात उपचार होतील या आशेने येथे येत असतात. परंतु या रु ग्णालयात आल्यानंतर रुग्णांची निराशा होत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मागील वर्षी लाखो रु पये खर्च करून रु ग्णालयाची इमारत सुबक केली असली तरी सुविधांचा मात्र पत्ता नाही. हे रुग्णालय असुविधांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या रुग्णालयात गोळ्या, औषधांची कमतरता अशा अनेक समस्या आहेत. एक वैद्यकीय अधिकारी रजेवर असताना दुसरा अधिकारी रजेवर जाणे कितपत योग्य आहे असा प्रश्न येथे येणाऱ्या रु ग्णांनकडून उपस्थित के ला जातआहे.मंगळवारी सकाळी ११ वाजता शिवसेना नेते भरत भगत, कळंब शिवसेना शाखाप्रमुख जनार्दन बदे, नरेश बदे, आसलम पानसरे, मुनिर सयरे, धनेश राणे, विशाल तुपे, समीर तरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली असता तेथे एकही डॉक्टर हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी चर्चा केली व त्यांनी लगेचच रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १७ महसुली गावे व २७ आदिवासी वाड्या असून पोशीर, पाषाणे, कळंब, खांडस, वारे अशी पाच उपकेंद्रे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात. परंतु याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे यावरून दिसते. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आल्यानंतर येथील डॉक्टर औषधे संपली आहेत, ती बाहेरून आणावी लागतील असा सल्ला देतात. मग हे रु ग्णालय सरकारी आहे की, एखादा खासगी दवाखाना असा प्रश्न ग्रामीण व आदिवासी भागातून येणाऱ्या रु ग्णांना पडतो.वैद्यकीय अधिकारी कर्तव्याचे पालन करत नाहीत अशी तक्र ार नागरिक करत आहेत.(वार्ताहर)कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पावरा हे दोन महिन्यांसाठी रजेवर आहेत. त्यांच्याजागी कडाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश कोकरे यांची नियुक्ती के लीहोती. तेही अचानक दोन दिवस न आल्याने त्यांच्या जागेवर डॉ. दिनेश जोशी यांना जाण्यास सांगितले होते. परंतु ते हजर झाले नाहीत. रु ग्णांची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था केली जाईल.- डॉ. सी. के. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जतसध्या उन्हामुळे सर्वत्र पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. जे शिल्लक पाणी आहे ते दूषित आहे. यामुळे साथीचे आजार पसरु शकतात. या आजारांना आवरण्यासाठी हे रु ग्णालय सज्ज असायला हवे. परंतु येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने रु ग्णालयाची रुग्णसेवा रामभरोसे आहे. त्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.-भरत भगत, शिवसेना माजी तालुकाप्रमुख।१७ महसुली गावेया प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत १७ महसुली गावे व २७ आदिवासी वाड्या असून पोशीर, पाषाणे, कळंब, खांडस, वारे अशी पाच उपकेंद्रे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येतात. परंतु याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे यावरून दिसते. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आल्यानंतर येथील डॉक्टर औषधे संपली आहेत, ती बाहेरून आणावी लागतील असा सल्ला देतात.