शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

... आहेत ती शहरे सुधारा

By admin | Updated: January 21, 2016 03:43 IST

शहरे सुधारण्यासाठी संवेदनशील, सुशिक्षित नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. शिवाय स्मार्ट सिटीचा हव्यास धरण्यापेक्षा आहेत

मुंबई : शहरे सुधारण्यासाठी संवेदनशील, सुशिक्षित नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज आहे. शिवाय स्मार्ट सिटीचा हव्यास धरण्यापेक्षा आहेत ती शहरे सुधारली तरच शहरे खऱ्या अर्थाने स्मार्ट होतील, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टी.आय.एस.एसमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय अधिवेशनात केले.देवनार येथील टाटा इन्स्टिट्युट आॅफ सोशल सायन्समध्ये ‘रिथिंकीग सिटीज इन द साऊथ ग्लोबल’ या विषयावर आंतरराष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘शहर विकास’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शहरात मोठ्या प्रमाणावर होणारे खासगीकरण हे शहर विकासास हानीकारक आहे. त्यामुळे खासगीकरण ताबडतोब स्थगित करावे. तर प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर खंत व्यक्त केली. एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी देशात अनेक विभागांची मंजूरी मिळवावी लागते. या लांबणाऱ्या प्रक्रियेत बदल करावा. तसेच शहरे विकसित करायची असतील तर शहरे बकाल करण्यास कारणीभूत असणाऱ्या ‘एसआरए’ प्रकल्पांवर वेसण घालावी, असे आंबेडकर म्हणाले. शिवाय भारतात निवडून आलेल्या महिलेला समान वागणूक दिली जात नाही. त्यासाठी महिलांनाही पुरुषांबरोबरीने स्थान देणारी व्यवस्था तयार व्हायला हवी, असे भारती शर्मा यांनी नमुद केले.आंतरराष्ट्रीय अधिवेशनात भारतातील शहरांसोबत जकार्ता, रिओ द जिनेरो, कराची, इस्तंबूल या शहरांच्या समस्या आणि उपाययोजना चर्चिल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)