शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अमर महल उड्डाणपुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार

By admin | Updated: April 17, 2017 23:10 IST

पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाण पुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाण पुलाचा नादुरुस्त गाळा बदलविण्यात येणार असून येत्या चार महिन्यांत हा पुल वाहतुकीस पुर्ववत सुरु करण्यात येईल. तोपर्यंत होणाऱ्या गैरसोयीबद्दल जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाण पुलाच्या दुरुस्तीबाबत माहिती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव पी. एल. बोंगीरवार उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले की, पूर्व द्रुतगती मार्गावरील अमरमहल उड्डाणपुलाचे गर्डरचे सांधे नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले होते. या पुलाचे बांधकाम 22 वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. या पुलाची लांबी 267 मीटर असून त्या पैकी 61 मीटरचा गाळा बाधित झाला आहे. तूर्त या पुलावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, पुलाखालील वाहतूक अतिरिक्त गाळ्यातून सुरळीत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.या पुलाच्या सुरक्षिततेसाठी व भविष्यातील हानी टाळण्याच्या दृष्टीने तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी आयआयटी, पवई येथील प्रा. डॉ. रवी सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानुसार या पुलाचे नादुरुस्त झालेले गर्डर नव्याने बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्यात येऊन या पुलावरील वाहतूक पुर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.या पुलावरील अपेक्षित जड वाहतूकीपेक्षा सध्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुलाचा सांधा निखळण्याची शक्यता असल्याचे सांगून पाटील म्हणाले की, सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील इतर पुलांच्या सुरक्षिततेबाबत शासनाचे धोरण सर्व ब्रिटीशकालीन व धोकादायक वाटणाऱ्या पुलांच्या सर्वंकष तपासणीकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर, मुंबईतील पुलांवरील वाढीव अवजड वाहतुकीचा विचार करता पुलांची सर्वंकष तपासणी व सर्वेक्षण करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणावरील वाहतुकीत सुलभता आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून जनतेने होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करण्याचे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.निविदेप्रक्रियेसाठी नोंदणीकृत कंत्राटदार असण्याची अट रद्दत्याचबरोबर, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणाऱ्या विविध कामांमध्ये निकोप स्पर्धा व्हावी व जास्तीत जास्त स्पर्धात्मक देकार मिळावेत यासाठी निविदा सादर करणारे कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पंजीकृत असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व कंत्राटदारांना पात्रता निकष पूर्ण करुन निविदेमध्ये सहभाग घेता येणार असल्याचा शासन निर्णय पारित करण्यात आला असल्याची माहिती ही पाटील यांनी यावेळी दिली.