शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

रोजगारनिर्मिती हाच महत्त्वाचा मुद्दा - राजन

By admin | Updated: April 27, 2016 05:00 IST

नवीन रोजगाराची निर्मिती हाच भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुनाथ राजन यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.

मुंबई : नवीन रोजगाराची निर्मिती हाच भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुनाथ राजन यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्टार्टअप्ससाठी चांगले व्यावसायिक वातावरण, छोट्या कंपन्यांसाठी उदार कायदे आणि चांगल्या सामाजिक सुरक्षेच्या गरजेवरही त्यांनी भर दिला आहे.यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी हे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, स्टार्टअप्सद्वारे रोजगार निर्मिती आणि स्वरोजगार ही सर्वात मोठी संधी आहे. यासाठी सरकारही कसोशीने प्रयत्न करीत आहे. ही स्पष्ट बाब आहे; परंतु प्रापर्टी राईट प्रोटेक्शन आणि पारदर्शी कर प्रणालीवरही लक्ष देण्याची गरज आहे.राजन यांनी पुन्हा एकदा छोट्या कंपन्यांसाठी सोपा प्रवेश आणि एक्झिट नॉर्म्स बनविण्यावर भर दिला. ते म्हणाले की, अशा कंपन्या सुरू करण्यासोबत त्या बंद करतानाही प्रचंड नियमांचा सामना करीत आहेत. उदार व्यावसायिक वातावरण केवळ आर्थिक प्रगतीच्या नजरेतून महत्त्वाचे आहे असे नव्हे, तर सामाजिक व्यवस्थेसाठीही ही बाब महत्त्वपूर्ण आहे. व्यावसायिक वातावरण अनुकूल होण्याने सामाजिक वातावरणालाही मदत मिळते.राजन म्हणाले की, नियम उदार केल्यामुळे जास्तीत जास्त दलित कंपन्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळेल यासाठी त्यांनी एका अहवालाचा उल्लेख केला. त्यात ब्रिटन आणि इटली यांच्यातील स्टार्टअप्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ते म्हणाले की, ब्रिटनच्या तुलनेत इटलीत जास्त स्टार्टअप्स कार्यक्रम सुरू होतात; पण जसजसा कल पुढे जातो तसतसे ब्रिटनमधील कंपन्यांची संख्या वाढत जाते. कारण ब्रिटनमध्ये छोट्या कंपन्यांसाठी उदार नियम आहेत, तर ते इटलीत कठोर आहेत.