शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

रोजगारनिर्मिती हाच महत्त्वाचा मुद्दा - राजन

By admin | Updated: April 27, 2016 05:00 IST

नवीन रोजगाराची निर्मिती हाच भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुनाथ राजन यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.

मुंबई : नवीन रोजगाराची निर्मिती हाच भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुनाथ राजन यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्टार्टअप्ससाठी चांगले व्यावसायिक वातावरण, छोट्या कंपन्यांसाठी उदार कायदे आणि चांगल्या सामाजिक सुरक्षेच्या गरजेवरही त्यांनी भर दिला आहे.यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी हे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, स्टार्टअप्सद्वारे रोजगार निर्मिती आणि स्वरोजगार ही सर्वात मोठी संधी आहे. यासाठी सरकारही कसोशीने प्रयत्न करीत आहे. ही स्पष्ट बाब आहे; परंतु प्रापर्टी राईट प्रोटेक्शन आणि पारदर्शी कर प्रणालीवरही लक्ष देण्याची गरज आहे.राजन यांनी पुन्हा एकदा छोट्या कंपन्यांसाठी सोपा प्रवेश आणि एक्झिट नॉर्म्स बनविण्यावर भर दिला. ते म्हणाले की, अशा कंपन्या सुरू करण्यासोबत त्या बंद करतानाही प्रचंड नियमांचा सामना करीत आहेत. उदार व्यावसायिक वातावरण केवळ आर्थिक प्रगतीच्या नजरेतून महत्त्वाचे आहे असे नव्हे, तर सामाजिक व्यवस्थेसाठीही ही बाब महत्त्वपूर्ण आहे. व्यावसायिक वातावरण अनुकूल होण्याने सामाजिक वातावरणालाही मदत मिळते.राजन म्हणाले की, नियम उदार केल्यामुळे जास्तीत जास्त दलित कंपन्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळेल यासाठी त्यांनी एका अहवालाचा उल्लेख केला. त्यात ब्रिटन आणि इटली यांच्यातील स्टार्टअप्सचा अभ्यास करण्यात आला आहे. ते म्हणाले की, ब्रिटनच्या तुलनेत इटलीत जास्त स्टार्टअप्स कार्यक्रम सुरू होतात; पण जसजसा कल पुढे जातो तसतसे ब्रिटनमधील कंपन्यांची संख्या वाढत जाते. कारण ब्रिटनमध्ये छोट्या कंपन्यांसाठी उदार नियम आहेत, तर ते इटलीत कठोर आहेत.