शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

जळत्या अगरबत्तीभोवती घेतलेले फेरेही सप्तपदीच, उच्च न्यायालयचा महत्त्वपूर्ण निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:55 IST

जळत्या अगरबत्तीभोवती सात फेरे घेतले नाहीत, याचा अर्थ हिंदू विवाह कायद्यानुसार, पवित्र अग्नीपुढे सप्तपदी केला नाही, असा होत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने पतीला पत्नीपासून घटस्फोट देण्यास नकार दिला.

मुंबई : जळत्या अगरबत्तीभोवती सात फेरे घेतले नाहीत, याचा अर्थ हिंदू विवाह कायद्यानुसार, पवित्र अग्नीपुढे सप्तपदी केला नाही, असा होत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने पतीला पत्नीपासून घटस्फोट देण्यास नकार दिला.मुंबईचे रहिवासी अमित अगरवाल (बदलेले नाव) यांनी त्यांची पत्नी कमला अगरवाल (बदलेले नाव) हिच्याशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचे कारण देत, वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र, कुटुंब न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला अमित यांनी उच्च न्यायालयात अपील केले. यावरील सुनावणी न्या. के. के. तातेड व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे सोमवारी होती.अमित अगरवाल यांच्या म्हणण्यानुसार, एका वर्तमानपत्रामध्ये आलेल्या जाहिरातीद्वारे त्यांना कमलाचा प्रस्ताव आला. १५ जानेवारी २००९ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर, लगेच १३ फेब्रुवारी २००९ रोजी विवाह ठरला. विवाहाच्या दिवशी दोन्ही पक्षांमध्ये वाद झाल्याने दोघांचा विवाह मोडला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी एका सामाजिक कार्यकर्तीचा फोन आला. तिने जवळच्या एका हनुमानाच्या मंदिरात बोलावले. मंदिरात न आल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार नोंदविण्याची धमकी दिली. त्यामुळे तो मंदिरात गेला. तिथे त्याचे जबरदस्तीने कमलाशी लग्न लावून दिले. मीडिया व फोटोग्राफर्सना तिथे उपस्थित करण्यात आले आणि जबरदस्तीने कागदांवर सह्या करून घेण्यात आल्या.‘हिंदू विवाह कायद्यानुसार, हवनाभोवती सात फेरे घेणे बंधनकारक आहे, परंतु आमची सप्तपदी पवित्र अग्नीभोवती झाली नाही. हा विवाह हिंदू कायद्यानुसार झालेला नाही. त्यामुळे हा विवाह रद्द करण्यात यावा,’ अशी विनंती अगरवाल यांनी न्यायालयाला केली.त्यावर कमलाने आक्षेप घेतला. त्याचे आरोप फेटाळताना तिने न्यायालयाला सांगितले की, हनुमानाच्या मंदिरात अमितने बोलावले. त्याच्याबरोबर पाच-सहा नातेवाईक होते व त्याची आईही होती. पुजाºयाने मंत्र म्हणून आम्ही पेटलेल्या अगरबत्त्यांंभोवती सात फेरे घेतले आहे. १४ फेब्रुवारी रोजी लग्न झाल्यावर, अमितने कमलाला त्याच्या घरी नेले. २८ एप्रिल २००९ पर्यंत तो तिच्याशी नीट वागत होता. या कालावधीतया दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले. मात्र, अचानक २९ एप्रिल रोजी अमितने तिला घटस्फोटाची नोटीस बजावली. घटस्फोट मागण्याचे कारणही सांगितले नाही.