शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

अमरापूरकरांच्या अस्थींचे विधी न करता विसर्जन

By admin | Updated: November 17, 2014 03:36 IST

ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांच्या इच्छेनुसार धर्मपरंपरेनुसार कोणताही विधी न करता त्यांच्या अस्थींचे शेतात विसर्जन करण्यात आले

अहमदनगर : ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांच्या इच्छेनुसार धर्मपरंपरेनुसार कोणताही विधी न करता त्यांच्या अस्थींचे शेतात विसर्जन करण्यात आले. अमरापूरकर यांनी मृत्यूनंतर एकप्रकारे नव्या पिढीला पुरोगामी विचारांचे संस्कार दिले.दशक्रिया व त्यानंतरचा तेराव्याचा विधीही त्यांच्या कुटुंबियांनी केला नाही़ तसेच वर्षश्राद्धही होणार नाही़ माझ्या मृत्यूनंतर माझा कुठलाही धार्मिक विधी करू नका, फक्त माझे विचार, कार्य आणि संस्कार जिवंत ठेवा, अशी अमरापूरकरांची इच्छा होती़ सजग अभिनयाने चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजविणारे नगरचे भूमिपुत्र सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबरला मुंबईत निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या मुलींनी त्यांना अग्नी दिला़ एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर प्रत्येक धर्मात एक वर्ष मोठा धार्मिक विधी असतो़ मात्र, अमरापूरकर यांनी आयुष्यभर सामाजिक चळवळीशी संबंध ठेवून पुरोगामी विचारांची जोपासना केली़अंधश्रद्धा कर्मकांडाला विरोध केला़ त्यांच्या इच्छेनुसार निधनाच्या दुसऱ्या दिवशी अस्थींचे धार्मिकस्थळी विसर्जन न करता त्यांच्या खंडाळा येथील शेतात आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्यात आली़ वृक्षांच्या खोडाला अस्थी समर्पित करण्यात आल्या़ अशा प्रकारे सामाजिक चळवळीशी बांधिलकी जपणारा आणि पुरोगामी विचारांची शिदोरी घेऊन वावरणारा माणूस मरणानंतरही पुरोगामी विचार पुढच्या पिढीला देवून गेला. त्यांच्या या विचारांचा ठसा समाजावर कायम राहील, अशी भावना व्यक्त झाली. (प्रतिनिधी)