शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अमरापूरकरांच्या अस्थींचे विधी न करता विसर्जन

By admin | Updated: November 17, 2014 03:36 IST

ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांच्या इच्छेनुसार धर्मपरंपरेनुसार कोणताही विधी न करता त्यांच्या अस्थींचे शेतात विसर्जन करण्यात आले

अहमदनगर : ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी आणि सामाजिक कार्यकर्ते सदाशिव अमरापूरकर यांच्या इच्छेनुसार धर्मपरंपरेनुसार कोणताही विधी न करता त्यांच्या अस्थींचे शेतात विसर्जन करण्यात आले. अमरापूरकर यांनी मृत्यूनंतर एकप्रकारे नव्या पिढीला पुरोगामी विचारांचे संस्कार दिले.दशक्रिया व त्यानंतरचा तेराव्याचा विधीही त्यांच्या कुटुंबियांनी केला नाही़ तसेच वर्षश्राद्धही होणार नाही़ माझ्या मृत्यूनंतर माझा कुठलाही धार्मिक विधी करू नका, फक्त माझे विचार, कार्य आणि संस्कार जिवंत ठेवा, अशी अमरापूरकरांची इच्छा होती़ सजग अभिनयाने चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजविणारे नगरचे भूमिपुत्र सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबरला मुंबईत निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या मुलींनी त्यांना अग्नी दिला़ एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर प्रत्येक धर्मात एक वर्ष मोठा धार्मिक विधी असतो़ मात्र, अमरापूरकर यांनी आयुष्यभर सामाजिक चळवळीशी संबंध ठेवून पुरोगामी विचारांची जोपासना केली़अंधश्रद्धा कर्मकांडाला विरोध केला़ त्यांच्या इच्छेनुसार निधनाच्या दुसऱ्या दिवशी अस्थींचे धार्मिकस्थळी विसर्जन न करता त्यांच्या खंडाळा येथील शेतात आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्यात आली़ वृक्षांच्या खोडाला अस्थी समर्पित करण्यात आल्या़ अशा प्रकारे सामाजिक चळवळीशी बांधिलकी जपणारा आणि पुरोगामी विचारांची शिदोरी घेऊन वावरणारा माणूस मरणानंतरही पुरोगामी विचार पुढच्या पिढीला देवून गेला. त्यांच्या या विचारांचा ठसा समाजावर कायम राहील, अशी भावना व्यक्त झाली. (प्रतिनिधी)