शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

आधार कार्ड जोडल्यास तत्काळ पासपोर्ट

By admin | Updated: January 28, 2016 03:15 IST

पासपोर्टसाठी पहिल्यांदा अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या आधार कार्डातील व पासपोर्ट केलेली माहिती जुळल्यास त्याला पासपोर्ट कार्यालयाकडून तत्काळ पासपोर्ट देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण

पुणे : पासपोर्टसाठी पहिल्यांदा अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या आधार कार्डातील व पासपोर्ट केलेली माहिती जुळल्यास त्याला पासपोर्ट कार्यालयाकडून तत्काळ पासपोर्ट देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय पासपोर्ट विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. पासपोर्टसाठी करण्यात येणारी पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया त्यानंतर पार पाडली जाणार आहे. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर सध्या पासपोर्ट मिळण्यास एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. संबंधित अर्जदाराच्या नावावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत याची चौकशी करण्यासाठी मोठा कालावधी लागत असल्याने पासपोर्ट मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे लगेच परदेश दौऱ्यावर जाणे आवश्यक असलेल्या अर्जदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता आधार कार्डातील व पासपोर्टसाठी दिलेली माहिती जुळल्यास संबंधित अर्जदाराचे पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया नंतर केली जाणार आहे. त्यामुळे अर्जदाराला लगेच पासपोर्ट मिळणे शक्य होणार आहे. त्यासाठी अर्जदाराला पासपोर्टच्या अर्जासोबत केवळ एक प्रतिज्ञापत्र जोडून द्यावे लागणार आहे. त्यामध्ये त्याच्यावर कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नसल्याचे नमूद करावे लागणार आहे. आधार कार्ड व पासपोर्ट लिंक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे आधार कार्डातील माहिती पासपोर्ट कार्यालयास उपलब्ध झाली आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना आधार कार्ड त्याचबरोबर निवडणूक ओळखपत्र व पॅन कार्डची झेरॉक्सही जोडावी लागणार आहे. तात्काळ पासपोर्टसाठी वेगळया पध्दतीने अर्ज करावा लागत होता. या अर्जासोबत आयपीएस/आयएएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे शिफारस पत्र जोडून द्यावे लागत होते. मात्र अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिफारस पत्र देण्यास नकार दिला जात असल्याने तात्काळ मधून पासपोर्ट मिळणे अवघड बनले होते. यापार्श्वभुमीवर स्वत: प्रतिज्ञापत्रावर गुन्हे दाखल नसल्याची हमी दिल्यास तात्काळ पासपोर्ट उपलब्ध होणार आहे. लगेच पोलीस व्हेरिफिकेशन करून मिळावे याकरिता पोलिस ठाण्यात सतत चकरा मारण्याचा अर्जदारांचा त्रास या निर्णयामुळे वाचणार आहे. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असताना पासपोर्ट मिळविण्याचा गैरप्रकारही यातून होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.