शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

१८ जूनला देशभरात डॉक्टर करणार काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध; आयएमएची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 22:02 IST

१८ जून रोजी देशभरात सर्वत्र डॉक्टर प्रतिकात्मक निषेध म्हणून काळ्या फिती वापरून काम करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

डोंबिवली: कोविडच्या महामारीतही खाजगी क्षेत्रातील रूग्णालय कर्मचारी,डॉक्टर्स यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रचंड काम केले. कितीतरी डॉक्टरांना उपचार करतांना स्वतःलाच कोरोनाची लागण झाली. अनेक डॉक्टर्स मृत्युच्या दारातून परतले. मात्र अशी सेवाकार्य करत असताना शुल्लक कारणांनी त्याना मारहाण, धमक्या, रुग्णालयावर हल्ले असे सत्र सुरू आहेत. त्याबद्दल केंद्र, राज्य सरकार काहीच करत नाही, त्यामुळे १८ जून रोजी देशभरात सर्वत्र डॉक्टर प्रतिकात्मक निषेध म्हणून काळ्या फिती वापरून काम करणार आहेत. आयएमएचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे यांच्यासह डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. भक्ती लोटे, डॉ. नीती उपासनी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

सतत हे हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याने त्या विरोधात कठोर असा केंद्रीय कायदा सरकारने त्वरित आणावा. हल्लेखोर समाजकंटकांवर जलद न्यायालयात सुनावणी होऊन कठोर कारवाई व्हावी. या समाजकंटकांना जामीन मिळू नये अशी तरतूद या कायद्यात असावी. रूग्णालय आणि दवाखाने हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावी, अशी।मागणी त्यांनी केली. याबाबत बुधवारी त्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, हल्ले होत असतानाही रुग्णसेवा कार्य अखंडित राहण्यासाठी डॉक्टर्स नेटाने आणि जीव तोडून काम करत आहेत. पण काही ठिकाणी दमदाटी करणे, अर्वाच्च भाषा वापरणे इथपासून ते जीवघेणी मारहाण करणेपर्यंत हे हल्ले होत आहेत. आसाम मध्ये डॉ. दत्ता या वरिष्ठ डॉक्टरांवर असाच प्राणघातक हल्ला झाला आणि त्यांचा त्या हल्ल्यात मृत्यु झाला. गेल्या काही दिवसात असे बरेच हल्ले भारतातील विविध राज्यात डॉक्टरांवर झाले. आसाम मधे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या चित्रफिती मध्ये हे हल्ले किती भयानक आणि अमानुष आहेत हे उघडपणे दिसले. सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब कठोर पावलं उचलणे आवश्यक आहे. त्यातच रामदेव योग गुरूंनी डॉक्टरांची आणि आधुनिक उपचार पद्धतीची अपमानास्पद खिल्ली उडवली. मृत डॉक्टरांबद्दल त्यांनी हीन वक्तव्य करून त्यांचा अपमान केला. ह्या रामदेव वर सरकार कारवाई का करत नाही? हे अनाकलनीय आहे. असोसिएशनची यासह कायदा बनवण्याची मागणी करत आहे. तरी सरकारने यापुढेही दाद न दिल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल असे पाटे म्हणाले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली