शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मी उभा आहे रंगमंचावर एकटा...

By admin | Updated: February 28, 2017 01:36 IST

नांदीनंतर पडदा पडला तेव्हा मी तुडुंब भरलेलो होतो, हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी’....

पुणे : ‘नांदीनंतर पडदा पडला तेव्हा मी तुडुंब भरलेलो होतो, हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी’.... ‘मी उभा आहे रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा’....‘नाटक नव्हे, तीन तासांचे अर्करूप अस्तित्व संपले आहे ते इथे फक्त माझ्याजवळ’... थरथरता तरीही धीरगंभीर आवाज, कातर स्वर, ‘चष्मा नको’ असे म्हणत स्वत:च्या दृष्टीवरचा विश्वास आणि कुसुमाग्रजांच्या शब्दांतून व्यक्त होणारा ‘नटसम्राट’... मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट अशी मुशाफिरी करणारे डॉ. श्रीराम लागू कुसुमाग्रजांच्या कवितेत रमले आणि त्यांच्या ‘परकाया प्रवेशाचा’ अत्युच्च आविष्कार रसिकांनी ‘वाहवा’ची दाद देत अनुभवला.निमित्त होते ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी केलेल्या कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांच्या वाचनाचे. कुसुमाग्रजांच्या ‘छंदोमयी’, ‘मुक्तायन’, ‘पाथेय’ या संग्रहांतील निवडक कवितांचे एकत्रीकरण असलेल्या ‘प्रवासी पक्षी’ या कवितासंग्रहाचे वाचकांसाठी नव्याने प्रकाशन झाले. कुसुमाग्रजांच्या श्रीराम लागू यांच्या आवाजातील कवितांच्या ‘कवितेच्या पलीकडे’ या सीडीचे अनावरणही या वेळी झाले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरधारा बुक गॅलरी आणि पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीने दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी डॉ. श्रीराम लागू, रामदास भटकळ, विजय लागू, रेणुका माडीवाले आदी मान्यवर उपस्थित होते. भटकळ म्हणाले, ‘मी कुसुमाग्रजांच्या कविता ऐकल्या, वाचल्या आणि अनुभवल्या आहेत. प्रत्येक वेळी कवितेचा नवा अर्थ उलगडत जातो. ‘नटसम्राट’ नाटकाला डॉ. श्रीराम लागू यांनी सर्वोच्च दर्जा मिळवून दिला. या नाटकातील भूमिकेत शिरलेले लागू त्यांना स्वत:ला समोर बसून अनुभवता येणार नाहीत, हे दुर्दैव. त्यांचे कवितावाचन पुढील पिढीपर्यंत गेल्यास तरुणाई समृद्ध होईल, याची खात्री वाटते.’(प्रतिनिधी)>कुसुमाग्रजांच्या कविता खऱ्या अर्थाने छंदमुक्त देशपांडे म्हणाले, ‘मी लहानपणापासून कुसुमाग्रजांच्या कवितांचा आणि डॉ. लागू यांच्या अभिनयाचा चाहता आहे. कुसुमाग्रजांच्या कविता खऱ्या अर्थाने छंदमुक्त आहेत. त्यात कधी आत्मचिंतनपर स्वगत, नाट्यछटेचा रंग, कधी नाट्यात्मक संवाद तर कधी कथाकथन अनुभवायला मिळते. लिखित भाषेचा गोडवा आणि गावरान भाषेचा ठसकाही अनुभवतो. मला कवींचे गद्य नेहमीच भावते. कुसुमाग्रजांच्या गद्याला आंतरिक लय असते आणि डॉ. लागू यांनी लयीचे भान ठेवत वाचन खुलवले आहे. त्यांच्या वाचनातून कवितेची मूळ व्यक्तिरेखा न बदलता ती श्रीमंत झाली आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेला अभिप्रेत असलेला ध्वनी म्हणजे डॉ. लागू यांचा आवाज आहे. लिखित अक्षरवाङ्मयाला समर्पक ध्वनिस्वरूप लाभले आहे.’