शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मी उभा आहे रंगमंचावर एकटा...

By admin | Updated: February 28, 2017 01:36 IST

नांदीनंतर पडदा पडला तेव्हा मी तुडुंब भरलेलो होतो, हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी’....

पुणे : ‘नांदीनंतर पडदा पडला तेव्हा मी तुडुंब भरलेलो होतो, हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी’.... ‘मी उभा आहे रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा’....‘नाटक नव्हे, तीन तासांचे अर्करूप अस्तित्व संपले आहे ते इथे फक्त माझ्याजवळ’... थरथरता तरीही धीरगंभीर आवाज, कातर स्वर, ‘चष्मा नको’ असे म्हणत स्वत:च्या दृष्टीवरचा विश्वास आणि कुसुमाग्रजांच्या शब्दांतून व्यक्त होणारा ‘नटसम्राट’... मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट अशी मुशाफिरी करणारे डॉ. श्रीराम लागू कुसुमाग्रजांच्या कवितेत रमले आणि त्यांच्या ‘परकाया प्रवेशाचा’ अत्युच्च आविष्कार रसिकांनी ‘वाहवा’ची दाद देत अनुभवला.निमित्त होते ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी केलेल्या कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांच्या वाचनाचे. कुसुमाग्रजांच्या ‘छंदोमयी’, ‘मुक्तायन’, ‘पाथेय’ या संग्रहांतील निवडक कवितांचे एकत्रीकरण असलेल्या ‘प्रवासी पक्षी’ या कवितासंग्रहाचे वाचकांसाठी नव्याने प्रकाशन झाले. कुसुमाग्रजांच्या श्रीराम लागू यांच्या आवाजातील कवितांच्या ‘कवितेच्या पलीकडे’ या सीडीचे अनावरणही या वेळी झाले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अक्षरधारा बुक गॅलरी आणि पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीने दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी डॉ. श्रीराम लागू, रामदास भटकळ, विजय लागू, रेणुका माडीवाले आदी मान्यवर उपस्थित होते. भटकळ म्हणाले, ‘मी कुसुमाग्रजांच्या कविता ऐकल्या, वाचल्या आणि अनुभवल्या आहेत. प्रत्येक वेळी कवितेचा नवा अर्थ उलगडत जातो. ‘नटसम्राट’ नाटकाला डॉ. श्रीराम लागू यांनी सर्वोच्च दर्जा मिळवून दिला. या नाटकातील भूमिकेत शिरलेले लागू त्यांना स्वत:ला समोर बसून अनुभवता येणार नाहीत, हे दुर्दैव. त्यांचे कवितावाचन पुढील पिढीपर्यंत गेल्यास तरुणाई समृद्ध होईल, याची खात्री वाटते.’(प्रतिनिधी)>कुसुमाग्रजांच्या कविता खऱ्या अर्थाने छंदमुक्त देशपांडे म्हणाले, ‘मी लहानपणापासून कुसुमाग्रजांच्या कवितांचा आणि डॉ. लागू यांच्या अभिनयाचा चाहता आहे. कुसुमाग्रजांच्या कविता खऱ्या अर्थाने छंदमुक्त आहेत. त्यात कधी आत्मचिंतनपर स्वगत, नाट्यछटेचा रंग, कधी नाट्यात्मक संवाद तर कधी कथाकथन अनुभवायला मिळते. लिखित भाषेचा गोडवा आणि गावरान भाषेचा ठसकाही अनुभवतो. मला कवींचे गद्य नेहमीच भावते. कुसुमाग्रजांच्या गद्याला आंतरिक लय असते आणि डॉ. लागू यांनी लयीचे भान ठेवत वाचन खुलवले आहे. त्यांच्या वाचनातून कवितेची मूळ व्यक्तिरेखा न बदलता ती श्रीमंत झाली आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेला अभिप्रेत असलेला ध्वनी म्हणजे डॉ. लागू यांचा आवाज आहे. लिखित अक्षरवाङ्मयाला समर्पक ध्वनिस्वरूप लाभले आहे.’