शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

मी राजेंद्र सिंह यांच्यासारखा तज्ज्ञ नाही

By admin | Updated: April 22, 2016 04:21 IST

उसाची लागवड वाढल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला, असे म्हणायला मी राजेंद्र सिंह यांच्यासारखा तज्ज्ञ नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

पुणे : उसाची लागवड वाढल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला, असे म्हणायला मी राजेंद्र सिंह यांच्यासारखा तज्ज्ञ नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. मराठवाड्यात गेल्या २० वर्षांपासून साखर कारखाने सुरू असून, तिथे आजच्यासारखा भीषण दुष्काळ कधी पडला नव्हता. त्यामुळे त्यामागच्या कारणांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये समिती स्थापन करण्यात आली असून, त्याचे निष्कर्ष येत्या १५-२० दिवसांत समोर येतील, असेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करताना राजेंद्र सिंह यांनी या दुष्काळासाठी साखर कारखाने कारणीभूत असल्याचे म्हटले होते. याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार यांनी वरील वक्तव्य केले. दुष्काळाची शास्त्रशुद्ध मीमांसा झाली पाहिजे, असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. जलसंधारणाची कामे करण्यासाठी सहकारी व खासगी सहकारी कारखाने प्रत्येकी २५ लाखांची मदत करणार आहेत. मराठवाड्यात जलसंधारणाच्या कामासाठी प्रत्येक साखर कारखान्याने १० लाख रुपये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात जलसंधारणाची कामे करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करावेत, असे आवाहन शरद पवार यांनी बैठकीत केले. त्यास सर्व प्रतिनिधींनी एकमताने सहमती दर्शविली.