शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मी राजेंद्र सिंह यांच्यासारखा तज्ज्ञ नाही

By admin | Updated: April 22, 2016 04:21 IST

उसाची लागवड वाढल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला, असे म्हणायला मी राजेंद्र सिंह यांच्यासारखा तज्ज्ञ नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.

पुणे : उसाची लागवड वाढल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला, असे म्हणायला मी राजेंद्र सिंह यांच्यासारखा तज्ज्ञ नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. मराठवाड्यात गेल्या २० वर्षांपासून साखर कारखाने सुरू असून, तिथे आजच्यासारखा भीषण दुष्काळ कधी पडला नव्हता. त्यामुळे त्यामागच्या कारणांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये समिती स्थापन करण्यात आली असून, त्याचे निष्कर्ष येत्या १५-२० दिवसांत समोर येतील, असेही त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करताना राजेंद्र सिंह यांनी या दुष्काळासाठी साखर कारखाने कारणीभूत असल्याचे म्हटले होते. याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार यांनी वरील वक्तव्य केले. दुष्काळाची शास्त्रशुद्ध मीमांसा झाली पाहिजे, असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. जलसंधारणाची कामे करण्यासाठी सहकारी व खासगी सहकारी कारखाने प्रत्येकी २५ लाखांची मदत करणार आहेत. मराठवाड्यात जलसंधारणाच्या कामासाठी प्रत्येक साखर कारखान्याने १० लाख रुपये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात जलसंधारणाची कामे करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करावेत, असे आवाहन शरद पवार यांनी बैठकीत केले. त्यास सर्व प्रतिनिधींनी एकमताने सहमती दर्शविली.