शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्या

By admin | Updated: June 9, 2016 04:26 IST

कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा व जवळचा रस्ता असलेल्या कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यालगत बेकायदा टपऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. एकीकडे स्मार्ट सिटीचे स्वप्न बघितले जात असताना दुसरीकडे समांतर रस्त्यावर होत असलेल्या विद्रुपीकरणाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. तातडीने या टपऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा महासभेत याबाबत आवाज उठवावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक व माजी विरोधीपक्षनेते विश्वनाथ राणे यांनी प्रशासनाला दिला आहे.कल्याण-डोंबिवलीत ये-जा करणारे सध्या समांतर रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. कल्याण-शीळ मार्गावरची वाहतूककोंडी, इंधनाचा होणारा अपव्यय पाहता केडीएमसीने काही वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता प्रस्तावित केला होता. या रस्त्याचे महापालिका हद्दीतील जवळपास ९५ टक्के काम पूर्णही झाले आहे. परंतु, रेल्वेच्या हद्दीतून सुमारे २०० मीटर जागेतून हा रस्ता जात असल्याने रेल्वे प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता होती. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला असता त्यांनी रस्त्याच्या बदल्यात २४ कोटी रुपयांची मागणी केडीएमसीकडे केली होती. त्यावर, केडीएमसीने कांचनगावातील जागा देण्याचा प्रस्ताव दिला. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले होते. परंतु, महापालिकेने दिलेली जागा रेल्वेने नुकतीच स्वीकारल्याने समांतर रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या महत्त्वाच्या रस्त्यालगत बेकायदा टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. मटणविक्रीची दुकाने, पानटपऱ्या, वेल्डिंगची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत. त्याकडे राणे यांनी लक्ष वेधले आहे. आतापर्यंत या रस्त्यावर ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. याच मार्गावर सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नुकतीच या मार्गाला भेट देऊन पाहणी केली होती. राष्ट्रीय रस्ते मानांकनाप्रमाणे या मार्गाच्या दोन्ही बाजूंना मिळून आठ फुटी पदपथ ठेवण्यात आला आहे. नागरिकांना याचा जॉगिंग ट्रॅक म्हणून वापर करण्याच्या अनुषंगाने कंत्राटदाराला वाढीव कामही देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>जुन्या रस्त्यावरही अतिक्रमणे कायमसमांतर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना लगतच्या टपऱ्यांकडे केडीएमसीचे होत असलेले दुर्लक्ष चुकीचे आहे. जुन्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटवण्यात प्रशासन पुरते अपयशी ठरले आहे. त्यात आता समांतर रस्त्यावरील टपऱ्यांची अतिक्रमणे न रोखल्यास नागरिक माफ करणार नाहीत, असे पत्र विश्वनाथ राणे यांनी आयुक्त ई. रवींद्रन व महापौर राजेंद्र देवळेकर यांना दिले आहे.