शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अवैध दारूविक्रीतील आरोपी अद्याप मोकाट

By admin | Updated: July 29, 2015 02:57 IST

अवैध दारूविक्रीप्रकरणी १९९३पासून गडचिरोली जिल्ह्यात १० हजारांपेक्षा अधिक आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र पोलीस तपासातील त्रुटी व पुराव्यांअभावी न्यायालयात

गडचिरोली : अवैध दारूविक्रीप्रकरणी १९९३पासून गडचिरोली जिल्ह्यात १० हजारांपेक्षा अधिक आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र पोलीस तपासातील त्रुटी व पुराव्यांअभावी न्यायालयात आरोपींची निर्दोष मुक्तता होत असल्याचे प्रमाण मोठे आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ एक ते दोन टक्क्यांच्या आसपासच आहे.१९९३मध्ये ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या नेतृत्वात झालेल्या जनआंदोलनामुळे जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र गेल्या २२ वर्षांत गावागावांत अवैध दारूचा व्यवसाय फोफावला. या अवैध व्यवसायाला कुटीर उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले असून, त्यात अनेक महिला, लहान मुलेही सहभागी झाले आहेत. दरवर्षी पोलीस अवैध दारूविक्रीचे किमान २ हजार गुन्हे दाखल करतात. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागही बोटावर मोजण्याइतकेच खटले दाखल करतो. मात्र पोलिसांच्या तपासात अनेकत्रुटी राहतात. परिणामी, आरोपी मोकाट सुटतात. पोलीस यंत्रणा दारूविक्रेत्याच्या घरावर माहितीच्या आधारावर धाड घालतात. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपनिरीक्षक, शिपाई, महिला पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान असा १५ ते २० लोकांचा फौजफाटा असल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद केले जाते. अनेक कारवायांमध्ये मुख्य आरोपी फरार असल्याची नोंद केली जाते. पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यानंतरही आरोपी फरार होतोच कसा, हा प्रश्न निर्माण होतो.न्यायालयात अनेकदा पंचही फितूर होतात. जप्त केलेली दारू प्रयोगशाळेकडे पाठविली जाते. गडचिरोली जिल्ह्याला वर्षाला ५०० नमुने पाठविण्याचे ‘टार्गेट’ आहे. जिल्ह्यात वर्षाला २ हजारांवर गुन्हे दाखल होत असल्याने नमुन्यांचा अहवालच येत नाही. अहवालाविना न्यायालयात सादर झालेले आरोपपत्र टिकत नाही. त्यामुळे आरोपींना पळवाट मिळते व ते निर्दोष सुटतात, असे एका ज्येष्ठ सरकारी वकिलांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.बऱ्याचदा पोलीस अवैध दारूविक्रेत्यांबाबत मवाळ भूमिका घेत खटला दाखल करतात. त्यामुळे कायद्याच्या पळवाटा शोधून आरोपी सुटतात आणि नंतर पुन्हा दारूचा व्यवसाय सुरू करतात. (प्रतिनिधी)चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या तीन बंदी असलेल्या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण करण्याची गरज आहे. सध्या नागपूर व अमरावती विभागासाठी केवळ नागपूरमध्येच प्रयोगशाळा आहे.पोलीस अवैध दारूविक्रीच्या प्रकरणांमध्ये पंच म्हणून स्थानिक नागरिकांना घेत नाहीत. ठरलेलेच पंच असतात. बऱ्याचदा प्रयोगशाळेचा अहवाल येण्यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले जाते. असे प्रकरण न्यायालयात टिकत नाही. - प्रमोद धाईत, वकील