शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा खोदकाम थांबविले

By admin | Updated: April 29, 2016 01:27 IST

निक नगरसेवक दिनेश धावडे यांनी या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्याच प्रभागात पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत सुरू असलेले खोदकाम थांबवले.

बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक ७२ अप्परचे स्थानिक नगरसेवक दिनेश धावडे यांनी या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्याच प्रभागात पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत सुरू असलेले खोदकाम थांबवले.प्रभाग क्रमांक ७२ मध्ये एका खासगी कंपनीचे केबल टाकण्याचे काम बुधवारी (दि. २७) सुरू करण्यात आले होते. अप्पर रोड ते महेश सोसायटी या रस्त्यावर ६०० मी. रस्ता खोदून केबल टाकण्याच्या कामाला पालिकेने काही अटी देऊन परवानगी दिली होती. मात्र, पालिकेच्या या अटींना केराची टोपली दाखवत या कंपनीचे काम सुरू होते. या कामाची पाहणी करणे, ज्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ते अधिकारी या कामावर फिरकलेदेखील नाहीत. स्थानिक नागरिकांनी नगरसेवक दिनेश धावडे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर धावडे यांनी कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता वर्कआॅर्डरवर असलेले अनेक नियम पायदळी तुडवत हे काम सुरू असल्याचे धावडे यांच्या लक्षात आले. धावडे यांनी या ठिकाणी स्थानिक पत्रकार तसेच पालिका अधिकाऱ्यांना बोलावले; परंतु एकही पालिका अधिकारी संपर्क करूनही पाहणीसाठी आले नाहीत.दिनेश धावडे यांनी पालिकेत जाऊन मुख्य अभियंता पथ विभाग यांची भेट घेतली. त्यानंतर पत्र देऊन हे काम जैसे थे ठेवण्याचे आदेश पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. या पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे, की वर्कआॅर्डरमधील सांगितलेल्या अटीनुसार पथ विभागाकडील अभियंत्याशी संपर्क साधून त्यांच्या सूचनेनुसार काम करणे आवश्यक असताना त्याप्रमाणे काम केले नाही. काम सुरु करण्यापूर्वी संबंधित मनपाच्या अभियंत्याकडून खोदाईची आउटलाइन मान्य करून घेणे आवश्यक असताना त्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही. तसेच जागेवर विहित नमुन्यातील (परवानगीचा दिनांक नमूद करून व आवश्यक सूचना नमूद करून) बोर्ड लावणे आवश्यक असताना त्याप्रमाणे बोर्ड लावलेला नाही. (वार्ताहर)>नियम पाळायला हवेत४एका वेळी १०० मी.पर्यंत खोदाई हाती घेणे आवश्यक असताना जागेवर एकाच वेळी सुमारे २०० मीटरहून अधिक खोदाईचे काम चालू केले आहे. पालिकेचे नियम पाळून संबंधित कंपनीने व त्यांच्या ठेकेदारांनी कामे केली असती तर आज संपूर्ण पुणेकरांना या रस्ते खोदाईच्या त्रासातून मुक्ती मिळाली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.