शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा खोदकाम थांबविले

By admin | Updated: April 29, 2016 01:27 IST

निक नगरसेवक दिनेश धावडे यांनी या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्याच प्रभागात पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत सुरू असलेले खोदकाम थांबवले.

बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक ७२ अप्परचे स्थानिक नगरसेवक दिनेश धावडे यांनी या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्याच प्रभागात पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत सुरू असलेले खोदकाम थांबवले.प्रभाग क्रमांक ७२ मध्ये एका खासगी कंपनीचे केबल टाकण्याचे काम बुधवारी (दि. २७) सुरू करण्यात आले होते. अप्पर रोड ते महेश सोसायटी या रस्त्यावर ६०० मी. रस्ता खोदून केबल टाकण्याच्या कामाला पालिकेने काही अटी देऊन परवानगी दिली होती. मात्र, पालिकेच्या या अटींना केराची टोपली दाखवत या कंपनीचे काम सुरू होते. या कामाची पाहणी करणे, ज्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ते अधिकारी या कामावर फिरकलेदेखील नाहीत. स्थानिक नागरिकांनी नगरसेवक दिनेश धावडे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर धावडे यांनी कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता वर्कआॅर्डरवर असलेले अनेक नियम पायदळी तुडवत हे काम सुरू असल्याचे धावडे यांच्या लक्षात आले. धावडे यांनी या ठिकाणी स्थानिक पत्रकार तसेच पालिका अधिकाऱ्यांना बोलावले; परंतु एकही पालिका अधिकारी संपर्क करूनही पाहणीसाठी आले नाहीत.दिनेश धावडे यांनी पालिकेत जाऊन मुख्य अभियंता पथ विभाग यांची भेट घेतली. त्यानंतर पत्र देऊन हे काम जैसे थे ठेवण्याचे आदेश पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. या पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे, की वर्कआॅर्डरमधील सांगितलेल्या अटीनुसार पथ विभागाकडील अभियंत्याशी संपर्क साधून त्यांच्या सूचनेनुसार काम करणे आवश्यक असताना त्याप्रमाणे काम केले नाही. काम सुरु करण्यापूर्वी संबंधित मनपाच्या अभियंत्याकडून खोदाईची आउटलाइन मान्य करून घेणे आवश्यक असताना त्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही. तसेच जागेवर विहित नमुन्यातील (परवानगीचा दिनांक नमूद करून व आवश्यक सूचना नमूद करून) बोर्ड लावणे आवश्यक असताना त्याप्रमाणे बोर्ड लावलेला नाही. (वार्ताहर)>नियम पाळायला हवेत४एका वेळी १०० मी.पर्यंत खोदाई हाती घेणे आवश्यक असताना जागेवर एकाच वेळी सुमारे २०० मीटरहून अधिक खोदाईचे काम चालू केले आहे. पालिकेचे नियम पाळून संबंधित कंपनीने व त्यांच्या ठेकेदारांनी कामे केली असती तर आज संपूर्ण पुणेकरांना या रस्ते खोदाईच्या त्रासातून मुक्ती मिळाली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.