शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बेकायदेशीर फलकांचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात

By admin | Updated: March 5, 2016 03:35 IST

बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पक्ष कार्यकर्ते मारहाण करतात. तर दुसरीकडे संरक्षण मागण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात तासंतास ताटकळत ठेवण्यात येते

मुंबई : बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी जाणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पक्ष कार्यकर्ते मारहाण करतात. तर दुसरीकडे संरक्षण मागण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात तासंतास ताटकळत ठेवण्यात येते. याची गांभीर्याने दखल घेत उच्च न्यायालयाने आता थेट राज्य सरकारलाच या प्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पोलीस महासंचालकांनाही सर्व पोलीस ठाण्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले.चेंबूर येथील बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, या प्रकरणी न्या. अभय ओक व न्या. आर. डी. धानुका यांच्या खंडपीठाने सर्वांना अवमान नोटीस बजावली. महापालिकेचे अधिकारी संरक्षण मागण्यासाठी देवनार पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना वाट पाहत ताटकळत ठेवले. त्यांना संरक्षणही दिले नाही, त्यामुळे खंडपीठाने या प्रकरणी वरिष्ठांना लक्ष घालण्याचे निर्देश दिले. तसेच संरक्षण मागण्यासाठी आलेल्या पोलिसांना वाट न पाहता संरक्षण देण्याचे आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना द्यावेत, असे निर्देशही खंडपीठाने पोलीस संचालकांना दिले. (प्रतिनिधी)>सेनेच्या निर्णयाचे स्वागतया प्रकरणी सामान्य माणसांनी उच्च न्यायालयाची पायरी चढण्याऐवजी पक्ष कार्यालयात तक्रार करावी, अशी सूचना गुरुवारी शिवसेनेतर्फे अ‍ॅड. विश्वजीत सावंत यांनी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ती धुडकावून लावली. शुक्रवारच्या सुनावणीवेळी अ‍ॅड. सावंत यांनी सेनेने अशा फलकांविषयी तक्रार करण्यासाठी १८००-२२-८५९५ हा टोल फ्री नंबर उपलब्ध केला असल्याची माहिती खंडपीठाला दिली.त्यावर खंडपीठाने तक्रारदाराचे नाव व त्याची इतर माहिती घेण्यात येणार नाही, याची खात्री करा, असे सेनेला सांगितले. मात्र तक्रारदाराची माहिती गुप्तच ठेवण्यात येईल, असे आश्वासन अ‍ॅड. सावंत यांनी दिले.शिवसेनेचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. याप्रमाणे अन्य राजकीय पक्षांनीही टोल फ्री नंबर उपलब्ध करावा व त्याची दखल घ्यावी, असे म्हणत खंडपीठाने प्रत्येक राजकीय पक्षाला असा टोल फ्री नंबर उपलब्ध करणार का? अशी विचारणा करत एका महिन्यात याचे उत्तर देण्याचे निर्देश दिले.