शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

मुलींसाठी आयआयटीमध्ये जागा वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 02:58 IST

आयआयटीमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची

मुंबई : आयआयटीमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ८ टक्के इतकीच आहे. ही संख्या वाढून २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट्य आज परिषदेत निश्चित करण्यात आल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. आयआयटी पवई येथे शुक्रवारी देशातील सर्व आयआयटीच्या कौन्सिलची ५१ वी परिषद पार पडली. या परिषदेत आयआयटीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा उपक्रमांची चर्चा करण्यात आली. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या अधिक असली तरी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी मुलींच्या जागा वाढवण्यात येणार आहे. तसेच, नीती आयोगाप्रमाणेच आयआयटीची कार्यपद्धती सुद्धा तीन भागात विभागली जाईल. याप्रमाणे कार्ययोजना ३ वर्षे, धोरण योजना ७ वर्षे आणि दीर्घकालीन योजना १५ वर्षांची असेल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. देशातील हुशार, कल्पक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षेद्वारे निवड करुन त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. पण, गेल्या काही वर्षांत आयआयटीमध्ये अभ्यास करत असताना वाढणाऱ्या ताणावर नियंत्रण न मिळवता आल्याने विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. घरापासून लांब असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास, आयआयटीच्या वातावरणाचा ताण येऊ नये म्हणून खास विद्यार्थ्यांसाठी ‘वेलनेस सेंटर’ची स्थापना करण्यात येणार आहे. सेंटरची स्थापना करताना विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी काय करता येईल याचा विशेष विचार केला जाणार आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीची ओळख करुन देण्याच्या पद्धतीतही आयआयटी कॅम्पस काय आहे हे त्यांना पहिल्याच दिवशी समजावून सांगितले जाणार असल्याचेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)