शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

मुलींसाठी आयआयटीमध्ये जागा वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2017 02:58 IST

आयआयटीमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची

मुंबई : आयआयटीमध्ये विद्यार्थिनींची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ८ टक्के इतकीच आहे. ही संख्या वाढून २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट्य आज परिषदेत निश्चित करण्यात आल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. आयआयटी पवई येथे शुक्रवारी देशातील सर्व आयआयटीच्या कौन्सिलची ५१ वी परिषद पार पडली. या परिषदेत आयआयटीची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा उपक्रमांची चर्चा करण्यात आली. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या अधिक असली तरी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी मुलींच्या जागा वाढवण्यात येणार आहे. तसेच, नीती आयोगाप्रमाणेच आयआयटीची कार्यपद्धती सुद्धा तीन भागात विभागली जाईल. याप्रमाणे कार्ययोजना ३ वर्षे, धोरण योजना ७ वर्षे आणि दीर्घकालीन योजना १५ वर्षांची असेल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. देशातील हुशार, कल्पक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षेद्वारे निवड करुन त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो. पण, गेल्या काही वर्षांत आयआयटीमध्ये अभ्यास करत असताना वाढणाऱ्या ताणावर नियंत्रण न मिळवता आल्याने विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. घरापासून लांब असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास, आयआयटीच्या वातावरणाचा ताण येऊ नये म्हणून खास विद्यार्थ्यांसाठी ‘वेलनेस सेंटर’ची स्थापना करण्यात येणार आहे. सेंटरची स्थापना करताना विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी काय करता येईल याचा विशेष विचार केला जाणार आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीची ओळख करुन देण्याच्या पद्धतीतही आयआयटी कॅम्पस काय आहे हे त्यांना पहिल्याच दिवशी समजावून सांगितले जाणार असल्याचेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)