शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

नागपूर, पुण्यात आयआयआयटी

By admin | Updated: May 21, 2015 02:43 IST

नागपूर आणि पुणे येथे भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : नागपूर आणि पुणे येथे भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संस्थांमध्ये २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. या निर्णयामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दर्जेदार शिक्षणाची सोय राज्यात उपलब्ध होईल. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट दर्जाचे मनुष्यबळ निर्माण व्हावे व विविध क्षेत्रांत माहिती तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरासाठी शिक्षणाचे मॉडेल तयार करणे हे या संस्थांच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट आहे. एन-पीपीपी या तत्त्वावर या दोन संस्था स्थापन करण्यात येत आहेत. त्यात केंद्राचा हिस्सा ५० टक्के, राज्याचा ३५ टक्के व खासगी भागीदाराचा हिस्सा १५ टक्के असेल. त्यासाठी या संस्थांकरिता केंद्र, राज्य आणि या प्रकल्पात सहभागी खासगी भागीदार यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात येणार आहे.नागपूर येथे संस्थेच्या स्थापनेसाठी एडीसीसी (नागपूर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (मुंबई) या उद्योजकांना उद्योजक भागीदार म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. तसेच पुणे येथील संस्थेसाठी रोल्टा इंडिया लिमिटेड (मुंबई), हबटाऊन लिमिटेड (मुंबई), क्विक हिल टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड (पुणे) या उद्योजकांना उद्योजक भागीदार म्हणून मान्यता देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत या संस्था स्थापन करण्याची वित्तीय जबाबदारी केंद्र शासन, राज्य शासन तसेच सहभागी खासगी भागीदार यामध्ये विभागली जाणार आहे. संस्थेच्या स्थापनेसाठी सुमारे १२८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. (विशेष प्रतिनिधी)नागपूर येथे स्थापन करण्यात येणाऱ्या भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्थेला वारंगा (ता.नागपूर ग्रामीण) येथील शासकीय जमीन दिली जाईल. नाममात्र एक रुपया दराने ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने ही जमीन देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मानव विकास संसाधन मंत्रालयाने देशात २० नवीन भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपुरात ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे. ही संस्था ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी स्वायत्त, स्वयंपूर्ण आणि संशोधनावर आधारित अध्यापनात कार्य करणारी असेल. यासाठी सुमारे ४० हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार आहे.चाकणला जमीनपुणे येथे स्थापन करण्यात येणाऱ्या आयआयटीला नाणोली (तर्फे) चाकण (ता.मावळ) येथील जमीन देण्यात येणार आहे. ४० हेक्टर जमीन पाच टक्के गायरान जमीन शिल्लक राहण्याची अट शिथिल करून नाममात्र एक रुपया दराने ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे.