शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

‘आयआयएम’ नागपूर की औरंगाबाद?

By admin | Updated: December 14, 2014 00:46 IST

‘आयआयएम’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) स्थापना नेमकी कुठल्या शहरात होणार, याबाबतच्या निर्णयाची नागपूर व औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना प्रतीक्षा आहे. आजच्या तारखेत या शर्यतीत

शासनाचे मौन : अधिवेशनात मुद्दा तापण्याची चिन्हेयोगेश पांडे - नागपूर‘आयआयएम’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) स्थापना नेमकी कुठल्या शहरात होणार, याबाबतच्या निर्णयाची नागपूर व औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना प्रतीक्षा आहे. आजच्या तारखेत या शर्यतीत नागपूर आघाडीवर असले तरी औरंगाबादचे लोकप्रतिनिधी तसेच उद्योजकांनी यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने मात्र यासंबंधात मौन साधले असून योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने राज्यात ‘आयआयएम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार करण्यात आला. मुंबई, पुणे या शहरांत जागेची वानवा असल्यामुळे औरंगाबाद आणि नागपूरपैकी एका शहराची निवड होण्याची शक्यता आहे. नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी जागेची उपलब्धता आहे. नागपुरात मिहान येथील २०० एकर जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला.दोन्ही शहरांचा दावादुसरीकडे औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील स्वतंत्र इमारत देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. शिवाय येथील अब्दीमंडी, करोडी तसेच ‘डीएमआयसी’साठी संपादित केलेल्या जागेचा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात आला आहे. नागपुरात आजच्या तारखेत ‘व्हीएनआयटी’ सोडले तर मोठे शैक्षणिक केंद्र नाही. ‘ट्रिपल आयटी’, ‘महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी’, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्था अद्याप कागदावरच आहेत. परंतु केंद्र व राज्यातील सत्ताबदलानंतर नागपूरचे राजकीय वजन वाढले आहे. शिवाय येथे दळणवळणाच्या सोयी सहजपणे उपलब्ध आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच शहर असल्याने उपराजधानीची बाजू उजवी दिसून येत आहे. दुसरीकडे ‘आयआयएम’ औरंगाबादलाच व्हावे, यासाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री, केंद्रातील विविध मंत्र्यांच्या भेटी घेण्यात आल्या. शैक्षणिक अनुशेष मराठवाड्यातही आहे. येथे राष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था आली तर परिसराचा विकास होण्यास मदत होईल, अशी भूमिका आहे. यासंदर्भात रविवारी औरंगाबादमध्ये जनप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे सदस्य, कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विधिमंडळात गाजणार मुद्दा‘आयआयएम’नेमके कुठल्या शहरात जाईल, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर ठोस उत्तर देण्यास नकार दिला. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. परंतु लवकरच प्रतीक्षा संपेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ‘आयआयएम’संदर्भात विधिमंडळात आवाज उपस्थित करण्याचा दोन्ही शहरातील जनप्रतिनिधींचा प्रयत्न राहणार आहे.